शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

उच्चभ्रूंची वसाहत संग्रामनगरचा अजूनही संपला नाही संग्राम, अजूनही टँकरच्या चकरा सुरूच

By साहेबराव हिवराळे | Updated: July 4, 2023 14:36 IST

एक दिवस एक वसाहत: ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे.

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील संग्रामनगर ही बँकर, शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, उद्योजक, शैक्षणिक संस्थांच्या टोलेजंग इमारती व घर, बंगले असलेली वसाहत आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे. आता काही रस्ते तयार आहेत तर अंतर्गत रस्त्यावर साधे खडीकरणही न केल्याने पावसाळ्यात चिखलातूनच वाट काढावी लागते.

नुकतेच संग्रामनगराच्या चोहोबाजूंची रस्ते सिमेंटीकरणाने बांधण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले असले तरी अंतर्गंत रस्त्यावर पाण्याचे लोंढे कायम वाहत असतात. अनेकांच्या घरासमोर पाणी तुंबल्याने त्यातून वाट काढत मुख्य रस्त्यावर जावे लागते. स्कूलबसचालक घरापर्यंत येण्यास नकार देतात. त्यामुळे त्रास पालकांना सहन करावा लागतो.

रस्त्यावरील कामे अपूर्णच...संग्रामनगरातील नागरिकांना पुलाखालून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील कामे अपूर्ण असून, रस्त्यावर देखील दुभाजकांचे काम पूर्ण नसल्याने रात्री वाहनधारकांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. दिशादर्शक चिन्ह नसल्याने अपघात होत आहेत.- रोहन पवार (रहिवासी)

मंजूर कामांना गती द्यावी...महानगरपालिकेत वॉर्डासाठी मंजूर केलेल्या कामाला मनपाने गती देण्याची गरज असून, ड्रेनेज व जलवाहिनी टाकल्यानंतरच रस्ते तयार करावेत, अन्यथा केवळ रस्ते खोदून ठेवू नयेत. खराब पथदिवे बदलण्याची गरज आहे.- माजी नगरसेविका सायली जमादार

अपघाताची भीती वाटते

रेणुकामाता कमान रस्त्यावर गतिरोधक हवेत या रस्त्यावरून वाहने सुसाट वेगाने पळविली जातात. मनपाने महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना व नागरिकांना अपघाताची भीती वाटते.- सय्यद याकूब (रहिवासी)

अजूनही टँकरवरच मदार...शहरातील घरं विकून सातारा परिसरात नागरिकांनी घर घेतले तर काहींनी स्वत: टोलेजंग बंगलेही उभारले. परंतु घरात पाण्याचा थेंब येत नाही. अनेक वर्षांपासून टँकर आणि जारच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.- अमोल सर्जे, रहिवासी

ड्रेनेज चोकअपचा त्रास थांबवा...नवीन ड्रेनेजलाईन काही परिसरात टाकली तर काही ठिकाणी आजही जुन्याच लाईन वापरल्या जात आहेत. त्यांची क्षमता कमी असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चोकअप होऊन सांडपाण्याचे डबके साचते अनेकांना त्यातूनच मार्ग काढावा लागतो. मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.- गणेश पवार, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका