शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रूंची वसाहत संग्रामनगरचा अजूनही संपला नाही संग्राम, अजूनही टँकरच्या चकरा सुरूच

By साहेबराव हिवराळे | Updated: July 4, 2023 14:36 IST

एक दिवस एक वसाहत: ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे.

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील संग्रामनगर ही बँकर, शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, उद्योजक, शैक्षणिक संस्थांच्या टोलेजंग इमारती व घर, बंगले असलेली वसाहत आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे. आता काही रस्ते तयार आहेत तर अंतर्गत रस्त्यावर साधे खडीकरणही न केल्याने पावसाळ्यात चिखलातूनच वाट काढावी लागते.

नुकतेच संग्रामनगराच्या चोहोबाजूंची रस्ते सिमेंटीकरणाने बांधण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले असले तरी अंतर्गंत रस्त्यावर पाण्याचे लोंढे कायम वाहत असतात. अनेकांच्या घरासमोर पाणी तुंबल्याने त्यातून वाट काढत मुख्य रस्त्यावर जावे लागते. स्कूलबसचालक घरापर्यंत येण्यास नकार देतात. त्यामुळे त्रास पालकांना सहन करावा लागतो.

रस्त्यावरील कामे अपूर्णच...संग्रामनगरातील नागरिकांना पुलाखालून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील कामे अपूर्ण असून, रस्त्यावर देखील दुभाजकांचे काम पूर्ण नसल्याने रात्री वाहनधारकांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. दिशादर्शक चिन्ह नसल्याने अपघात होत आहेत.- रोहन पवार (रहिवासी)

मंजूर कामांना गती द्यावी...महानगरपालिकेत वॉर्डासाठी मंजूर केलेल्या कामाला मनपाने गती देण्याची गरज असून, ड्रेनेज व जलवाहिनी टाकल्यानंतरच रस्ते तयार करावेत, अन्यथा केवळ रस्ते खोदून ठेवू नयेत. खराब पथदिवे बदलण्याची गरज आहे.- माजी नगरसेविका सायली जमादार

अपघाताची भीती वाटते

रेणुकामाता कमान रस्त्यावर गतिरोधक हवेत या रस्त्यावरून वाहने सुसाट वेगाने पळविली जातात. मनपाने महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना व नागरिकांना अपघाताची भीती वाटते.- सय्यद याकूब (रहिवासी)

अजूनही टँकरवरच मदार...शहरातील घरं विकून सातारा परिसरात नागरिकांनी घर घेतले तर काहींनी स्वत: टोलेजंग बंगलेही उभारले. परंतु घरात पाण्याचा थेंब येत नाही. अनेक वर्षांपासून टँकर आणि जारच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.- अमोल सर्जे, रहिवासी

ड्रेनेज चोकअपचा त्रास थांबवा...नवीन ड्रेनेजलाईन काही परिसरात टाकली तर काही ठिकाणी आजही जुन्याच लाईन वापरल्या जात आहेत. त्यांची क्षमता कमी असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चोकअप होऊन सांडपाण्याचे डबके साचते अनेकांना त्यातूनच मार्ग काढावा लागतो. मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.- गणेश पवार, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका