शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

उच्चभ्रूंची वसाहत संग्रामनगरचा अजूनही संपला नाही संग्राम, अजूनही टँकरच्या चकरा सुरूच

By साहेबराव हिवराळे | Updated: July 4, 2023 14:36 IST

एक दिवस एक वसाहत: ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे.

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील संग्रामनगर ही बँकर, शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, उद्योजक, शैक्षणिक संस्थांच्या टोलेजंग इमारती व घर, बंगले असलेली वसाहत आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे. आता काही रस्ते तयार आहेत तर अंतर्गत रस्त्यावर साधे खडीकरणही न केल्याने पावसाळ्यात चिखलातूनच वाट काढावी लागते.

नुकतेच संग्रामनगराच्या चोहोबाजूंची रस्ते सिमेंटीकरणाने बांधण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले असले तरी अंतर्गंत रस्त्यावर पाण्याचे लोंढे कायम वाहत असतात. अनेकांच्या घरासमोर पाणी तुंबल्याने त्यातून वाट काढत मुख्य रस्त्यावर जावे लागते. स्कूलबसचालक घरापर्यंत येण्यास नकार देतात. त्यामुळे त्रास पालकांना सहन करावा लागतो.

रस्त्यावरील कामे अपूर्णच...संग्रामनगरातील नागरिकांना पुलाखालून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील कामे अपूर्ण असून, रस्त्यावर देखील दुभाजकांचे काम पूर्ण नसल्याने रात्री वाहनधारकांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. दिशादर्शक चिन्ह नसल्याने अपघात होत आहेत.- रोहन पवार (रहिवासी)

मंजूर कामांना गती द्यावी...महानगरपालिकेत वॉर्डासाठी मंजूर केलेल्या कामाला मनपाने गती देण्याची गरज असून, ड्रेनेज व जलवाहिनी टाकल्यानंतरच रस्ते तयार करावेत, अन्यथा केवळ रस्ते खोदून ठेवू नयेत. खराब पथदिवे बदलण्याची गरज आहे.- माजी नगरसेविका सायली जमादार

अपघाताची भीती वाटते

रेणुकामाता कमान रस्त्यावर गतिरोधक हवेत या रस्त्यावरून वाहने सुसाट वेगाने पळविली जातात. मनपाने महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना व नागरिकांना अपघाताची भीती वाटते.- सय्यद याकूब (रहिवासी)

अजूनही टँकरवरच मदार...शहरातील घरं विकून सातारा परिसरात नागरिकांनी घर घेतले तर काहींनी स्वत: टोलेजंग बंगलेही उभारले. परंतु घरात पाण्याचा थेंब येत नाही. अनेक वर्षांपासून टँकर आणि जारच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.- अमोल सर्जे, रहिवासी

ड्रेनेज चोकअपचा त्रास थांबवा...नवीन ड्रेनेजलाईन काही परिसरात टाकली तर काही ठिकाणी आजही जुन्याच लाईन वापरल्या जात आहेत. त्यांची क्षमता कमी असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चोकअप होऊन सांडपाण्याचे डबके साचते अनेकांना त्यातूनच मार्ग काढावा लागतो. मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.- गणेश पवार, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका