शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

बाबासाहेबांच्या स्वप्नांचा झाला कोंडवाडा

By सुमेध उघडे | Updated: November 7, 2017 12:45 IST

नागसेनवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाचे हाल एखाद्या कोंडवाड्यासारखे झाले आहेत

- सुमेध उघडेलोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : नागसेनवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाचे हाल एखाद्या कोंडवाड्यासारखे झाले आहेत. राहण्यास नीटनेटकी खोली व पिण्यास पाणी या मूलभूत सोयीसुद्धा येथे नाहीत.मराठवाड्यासारख्या उपेक्षित भागातील नागरिकांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या विचाराने विद्यापीठ सुरू होण्याच्या आधी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालयाची स्थापना केली. आज केवळ मराठवाड्यातीलच नाही तर विदर्भ व खान्देश भागातील विद्यार्थीदेखील बाबासाहेबांच्या प्रेरणेने येथे शिक्षण घेण्यास येतात; परंतु येथील विधि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी वसतिगृहात आल्यास या विद्यार्थ्यांना वेगळेच चित्र दिसते.

पलंगाला काठीच्या टेकूचा आधारराऊंड हॉस्टेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वसतिगृहाची इमारत वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. मात्र, वसतिगृहाच्या आतील चित्र खूपच विदारक आहे. येथे बाथरूम आहे; पण त्यात पाणी नाही. चौकट आहे; पण दरवाजे व खिडक्या नाहीत. खोलीतील पलंग कसेतरी काठ्या व खुर्च्यांच्या टेकूवर उभे आहेत.

रंग उडालेल्या व प्लास्टर पडलेल्या भिंती, जागोजागी कोष्ट्याच्या जाळ्या, गळणारे कौलाचे छत असे भयानक चित्र येथे पाहावयास मिळते. एखाद्या कोंडवाड्यास शोभेल अशा भयाण वातावरणातही विद्यार्थी दुसरा काही पर्याय नाही म्हणून राहतात. यातच येथे राहणाºया विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती जेमतेम असल्याने ते बाहेर राहण्याचा विचारदेखील करू शकत नाहीत.

पाणी साठवण्याची व्यवस्थाच नाहीएखाद्या कोंडवाड्यासारखे असलेल्या या वसतिगृहात रोज सकाळी नळाला पाणी येते; परंतु ते साठवून ठेवण्याची व्यवस्थाच नाही. विद्यार्थी कसे तरी त्यांच्याकडील छोट्या बॉटल व बकेटमध्ये पाण्याचा साठा करतात. यामुळे ज्या दिवशी पाणी येत नाही तेव्हा विद्यार्थ्यांना शेजारील कब्रस्थानमधील हौदात साठवलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागते.

स्तंभ झाकोळलाराऊंड वसतिगृहाची शान असणारा अशोक स्तंभ त्याच्या भोवती अनियंत्रित वाढ झालेल्या झाडांनी झाक ोळून गेला आहे.

विद्यार्थी स्वत: करतात स्वच्छतावसतिगृहात नियमित साफसफाई होत नसल्याने विद्यार्थी स्वत: आपल्या खोल्यांसमोरील भाग स्वच्छ करतात.तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने या भागात बºयाचदा साप निघतात. खोल्यांचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या असल्याने ते यातून विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये सहज प्रवेशकरतात.

वाढलेल्या गवताने आजारास आमंत्रण  वसतिगृहात प्रवेश करताच चारी बाजूंनी गुडघ्यापर्यंत वाढलेले गाजर गवत दिसते. तसेच जागोजागी पडलेला कचºयाचा खच, साचलेले पाणी यामुळे येथे डासांचा उच्छाद आहे. दिवसासुद्धा डास चावत असल्याने मच्छरदानीतच राहावे लागते, अशा वातावरणात डेंग्यू, मलेरियासारखी आजाराची लागण या विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणास बोलावे? निवेदने दिली, तक्रारी केल्या; पण या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही. येथे रेक्टरसुद्धा नाही. केवळ एक शिपाई येथे रोज आराम करण्यास येतो. ना कोणत्या नेत्याला आमच्या समस्यांची जाण आहे ना या ऐतिहासिक वास्तूची कदर. आमच्या आधीचे विद्यार्र्थीसुद्धा तुम्ही फक्त अभ्यास करा, काही बदल होणार नाही हेच सांगतात, असे सध्या येथे राहत असलेले विद्यार्थी सांगतात; पण या परिस्थितीपुढे हतबल न होता हे विद्यार्थी खोलीत लावलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेकडून प्रेरणा घेत स्वत:स अभ्यासात मग्न करून घेतात.

बाबासाहेबांच्या स्मृती विस्मरणातसंपूर्ण नागसेनवनात बाबासाहेबांच्या स्मृती आहेत. या वास्तूमध्येही बाबासाहेबांच्या स्मृती आहेत. किमान त्या स्मृतिस्थळाचा विचार करून या वसतिगृहाची डागडुजी करण्यात यावी, अशी अपेक्षा हे विद्यार्थी करतात. कदाचित, यामुळेच प्रसिद्ध आंबेडकरवादी कवी वामनदादा कर्डक यांनी ‘भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते...’ अशा आशयाचे गीत रचले असेल. या चीड आणणा-या स्थितीवर भीमशक्ती विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सचिव अक्षय थोरात यांनी विधि महाविद्यालयाची प्राचार्य निरानंद बेहरा यांना एक निवेदन दिले आहे. यावर त्यांच्याकडून काही ठोस आश्वासन मिळाले नाही. तसेच लोकमत प्रतिनिधीने प्राचार्यांना मोबाइलवर संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.