शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांना हुडहुडी; आठवडाभरात पुन्हा घसरणार तापमानाचा पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 14:46 IST

औरंगाबादेत १ नोव्हेंबरपासून किमान तापमानात दररोज घट होत गेली.

ठळक मुद्देकिमान तापमानात वाढ उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मंद

औरंगाबाद :  नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आणि औरंगाबाद जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली. तापमानात दररोज घसरण होत गेल्याने गेली. दोन आठवडे औरंगाबादकरांना चांगलीच हुडहुडी भरली; परंतु उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावल्याने गेल्या दोन दिवसांत किमान तापमान ६ अंशांनी वाढले. परिणामी, थंडी कमी झाली; परंतु पुढच्या आठवड्यापासून पुन्हा तापमानाचा पारा घसरून थंडीचा कडाका वाढेल,  असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे.

औरंगाबादेत १ नोव्हेंबरपासून किमान तापमानात दररोज घट होत गेली. ११ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १२.० अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले. त्यामुळे जिल्ह्यात थंडीत वाढ झाली. मात्र, अवघ्या दोन दिवसांत किमान तापमान शनिवारी (दि.१४)१९.२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. त्यामुळे थंडी कमी झाली. गेल्या वर्षी थंडी १५ नोव्हेंबरनंतर दिवसा व रात्री अशी सुरू झाली होती. यावर्षी १५ डिसेंबरनंतर दिवसा व रात्री थंडी तसेच धुके असेल, २० डिसेंबरपासून रॅपिड थंडी वाढणार असून,  तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरेल. यंदा मार्च महिन्यापर्यंत थंडीचा अनुभव येईल. 

स्वेटरचा बाजार गरमहिवाळ्यामुळे सध्या उबदार कपड्यांची खरेदी करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. शहरातील मिल काॅर्नर, पैठणगेट, जवाहर काॅलनी, टीव्ही सेंटर रोड आदी भागांतील बाजारपेठेत स्वेटर, जाकीट खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदी करतानाही अनेकांनी उबदार कपडे खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसले. 

यंदा तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतेहवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग सध्या मंदावला आहे. त्यामुळे तापमानात वाढ  झालेली आहे; परंतु पुढच्या आठवड्यात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे. गतवर्षी औरंगाबादचे तापमान ८ अंशांपर्यंत घसरले होते. यंदा पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे यंदा किमान तापमान ५ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद