शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

औरंगाबादकरांना हुडहुडी; आठवडाभरात पुन्हा घसरणार तापमानाचा पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 14:46 IST

औरंगाबादेत १ नोव्हेंबरपासून किमान तापमानात दररोज घट होत गेली.

ठळक मुद्देकिमान तापमानात वाढ उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मंद

औरंगाबाद :  नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आणि औरंगाबाद जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली. तापमानात दररोज घसरण होत गेल्याने गेली. दोन आठवडे औरंगाबादकरांना चांगलीच हुडहुडी भरली; परंतु उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावल्याने गेल्या दोन दिवसांत किमान तापमान ६ अंशांनी वाढले. परिणामी, थंडी कमी झाली; परंतु पुढच्या आठवड्यापासून पुन्हा तापमानाचा पारा घसरून थंडीचा कडाका वाढेल,  असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे.

औरंगाबादेत १ नोव्हेंबरपासून किमान तापमानात दररोज घट होत गेली. ११ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १२.० अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले. त्यामुळे जिल्ह्यात थंडीत वाढ झाली. मात्र, अवघ्या दोन दिवसांत किमान तापमान शनिवारी (दि.१४)१९.२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. त्यामुळे थंडी कमी झाली. गेल्या वर्षी थंडी १५ नोव्हेंबरनंतर दिवसा व रात्री अशी सुरू झाली होती. यावर्षी १५ डिसेंबरनंतर दिवसा व रात्री थंडी तसेच धुके असेल, २० डिसेंबरपासून रॅपिड थंडी वाढणार असून,  तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरेल. यंदा मार्च महिन्यापर्यंत थंडीचा अनुभव येईल. 

स्वेटरचा बाजार गरमहिवाळ्यामुळे सध्या उबदार कपड्यांची खरेदी करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. शहरातील मिल काॅर्नर, पैठणगेट, जवाहर काॅलनी, टीव्ही सेंटर रोड आदी भागांतील बाजारपेठेत स्वेटर, जाकीट खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदी करतानाही अनेकांनी उबदार कपडे खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसले. 

यंदा तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतेहवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग सध्या मंदावला आहे. त्यामुळे तापमानात वाढ  झालेली आहे; परंतु पुढच्या आठवड्यात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे. गतवर्षी औरंगाबादचे तापमान ८ अंशांपर्यंत घसरले होते. यंदा पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे यंदा किमान तापमान ५ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद