शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

खराब रस्त्याचा मुख्यमंत्र्यांनाही फटका; हेलिकॉप्टरद्वारे केली महाजनादेश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:03 IST

औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम ठप्प  

ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठीच्या मेहनतीवर पाणी

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते जळगाव हा रस्ता कंत्राटदाराने खोदून ठेवल्यामुळे तो खराब अवस्थेत आहे. त्याचा फटका बुधवारी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बसला. महाजनादेश यात्रेचा रथ (व्हॅनिटी व्हॅन) खराब रस्त्यांमुळे फुलंब्री ते सिल्लोडपर्यंत जाणे शक्य नसल्यामुळे त्यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने फुलंब्रीतील सभास्थान गाठले. दरम्यान पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व रथाच्या आगमनाप्रीत्यर्थ केलेल्या स्वागताच्या तयारीवर पाणी फेरले गेले. 

मुख्यमंत्र्यांची यात्रा ज्या मार्गाने जाणार होती, त्या मार्गावर जि. प. सदस्य अनुराधा चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागताची तयारी केली होती. परंतु मुख्यमंत्री त्या मार्गाने आलेच नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. औरंगाबाद ते जळगाव हा रस्ता अनेक ठिकाणी कामासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. सिल्लोडपर्यंत तो रस्ता खराबच आहे. पुलाचे काम सुरू  असल्यामुळे रस्ता उखडलेला आहे. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे काही ठिकाणी तातडीने डागडुजी करण्यात आली. परंतु मुख्यमंत्री त्या रोडने आलेच नाहीत. फुलंब्री ते सिल्लोड आणि पुढे भोकरदनमार्गे जालन्याकडे गेले.

२२ हजार प्रवाशांना दररोज खड्डेमय रस्त्यांच्या ‘यातना’औरंगाबाद ते जळगाव चौपदरी रस्त्याचे काम रेंगाळल्याचा फटका दररोज हजारो प्रवाशांना बसत आहे. प्रवासाचा कालावधी वाढला असून, विलंबासह आदळआपटीच्या यातना प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. फुलंब्रीमार्गे या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या २७९ बसगाड्यांतून तब्बल २२ हजार नागरिक प्रवास करतात. मध्यवर्ती बसस्थानकातून एकट्या फुलंब्रीसाठी २७ बसफेऱ्या करतात. तर जळगाव, बºहाणपूरसाठी १२ बसगाड्या धावतात. याशिवाय इतर आगार, इतर विभागांच्या बसच्या संख्येंचा विचार करता दिवसभरात २७९ बसगाड्यांची ये-जा होते. एका बसमध्ये किमान ४० प्रवासी असतात. याचा विचार करता २२ हजार प्रवासी या खड्डेमय रस्त्यांवरून ये-जा करीत आहेत. औरंगाबादहून फुलंब्रीचा प्रवास साधारण ४० मिनिटांचा आहे. परंतु आजघडीला तो दीड दोन तासांवर गेला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ‘एस. टी.’च्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. ‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस. टी.’ असे वाक्य सत्यात उतरविण्यासाठी गावागावांपर्यंत एस. टी. पोहोचविण्याचा प्रयत्न एस. टी. महामंडळाकडून केला जातो. परंतु खराब रस्त्यांमुळे प्रवाशांसह एस.टी. महामंडळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद