शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
4
Viral Video: "दातं आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
5
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
6
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
7
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
8
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
9
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
10
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
11
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
12
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
13
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
14
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
16
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
17
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
18
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
19
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
20
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत

खराब रस्त्याचा मुख्यमंत्र्यांनाही फटका; हेलिकॉप्टरद्वारे केली महाजनादेश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:03 IST

औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम ठप्प  

ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठीच्या मेहनतीवर पाणी

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते जळगाव हा रस्ता कंत्राटदाराने खोदून ठेवल्यामुळे तो खराब अवस्थेत आहे. त्याचा फटका बुधवारी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बसला. महाजनादेश यात्रेचा रथ (व्हॅनिटी व्हॅन) खराब रस्त्यांमुळे फुलंब्री ते सिल्लोडपर्यंत जाणे शक्य नसल्यामुळे त्यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने फुलंब्रीतील सभास्थान गाठले. दरम्यान पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व रथाच्या आगमनाप्रीत्यर्थ केलेल्या स्वागताच्या तयारीवर पाणी फेरले गेले. 

मुख्यमंत्र्यांची यात्रा ज्या मार्गाने जाणार होती, त्या मार्गावर जि. प. सदस्य अनुराधा चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागताची तयारी केली होती. परंतु मुख्यमंत्री त्या मार्गाने आलेच नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. औरंगाबाद ते जळगाव हा रस्ता अनेक ठिकाणी कामासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. सिल्लोडपर्यंत तो रस्ता खराबच आहे. पुलाचे काम सुरू  असल्यामुळे रस्ता उखडलेला आहे. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे काही ठिकाणी तातडीने डागडुजी करण्यात आली. परंतु मुख्यमंत्री त्या रोडने आलेच नाहीत. फुलंब्री ते सिल्लोड आणि पुढे भोकरदनमार्गे जालन्याकडे गेले.

२२ हजार प्रवाशांना दररोज खड्डेमय रस्त्यांच्या ‘यातना’औरंगाबाद ते जळगाव चौपदरी रस्त्याचे काम रेंगाळल्याचा फटका दररोज हजारो प्रवाशांना बसत आहे. प्रवासाचा कालावधी वाढला असून, विलंबासह आदळआपटीच्या यातना प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. फुलंब्रीमार्गे या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या २७९ बसगाड्यांतून तब्बल २२ हजार नागरिक प्रवास करतात. मध्यवर्ती बसस्थानकातून एकट्या फुलंब्रीसाठी २७ बसफेऱ्या करतात. तर जळगाव, बºहाणपूरसाठी १२ बसगाड्या धावतात. याशिवाय इतर आगार, इतर विभागांच्या बसच्या संख्येंचा विचार करता दिवसभरात २७९ बसगाड्यांची ये-जा होते. एका बसमध्ये किमान ४० प्रवासी असतात. याचा विचार करता २२ हजार प्रवासी या खड्डेमय रस्त्यांवरून ये-जा करीत आहेत. औरंगाबादहून फुलंब्रीचा प्रवास साधारण ४० मिनिटांचा आहे. परंतु आजघडीला तो दीड दोन तासांवर गेला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ‘एस. टी.’च्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. ‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस. टी.’ असे वाक्य सत्यात उतरविण्यासाठी गावागावांपर्यंत एस. टी. पोहोचविण्याचा प्रयत्न एस. टी. महामंडळाकडून केला जातो. परंतु खराब रस्त्यांमुळे प्रवाशांसह एस.टी. महामंडळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद