शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

औरंगाबादमध्ये प्लास्टिक विक्रेत्यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:51 IST

राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी शनिवारपासूनच आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्दे१५ लाखांची उलाढाल ठप्प : १८०० परिवारावर बेरोजगारीची कु-हाड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी शनिवारपासूनच आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.राज्यात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून प्लास्टिक तसेच थर्माकोलवर बंदी आणण्यात आली. शनिवारी सकाळी ही वार्ता सर्वत्र पसरली. शहरातील व्यापाऱ्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवरही शासनाच्या अधिसूचनेची प्रत व्हायरल झाली होती.त्यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी आपली दुकाने उघडलीच नाही. प्रत्येक दुकानावर बेमुदत बंदचे फलक लावण्यात आले होते, ते असे...‘डोकं फिरलं या सरकारचं महाराष्ट्र शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीचा कठोर निर्णय घेतला, त्याच्या निषेधार्थ बेमुदत बंद’ असे फलकावर लिहिण्यात आले होते. मोंढ्यातील मोतीकारंजा परिसरात सर्व प्लास्टिक विक्रेते एकवटले होते. प्लास्टिक शॉप असोसिएशनचे सचिव शेख नाजीम यांनी सांगितले की, शहरात आजघडीला ५० लहान-मोठे प्लास्टिकचे होलसेलर आहेत व सुमारे ३०० फेरीवाले प्लास्टिक विकतात. दररोज १५ लाखांची उलाढाल होते. यावर आधारित १८०० परिवार बेरोजगार होणार आहेत.तसेच मिठाई, बेकरी, गृहउद्योग, तेल उद्योग, कपडा, रेडिमेड, होजिअरी, फूड पॅकिंग आदी व्यवसायावरही मोठा फरक पडणार आहे. २००६ च्या नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग विक्रीवर बंदी आहे. त्याची आम्ही अंमलबजावणी करीत आहोत.मात्र, संपूर्ण प्लास्टिक बंदी योग्य नाही. महिनाभरात शिल्लक प्लास्टिक परराज्यांत विक्रीचे आदेश देण्यात आले आहेत. याविरोधात आम्ही बेमुदत बंद पुकारला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व प्लास्टिक होलसेलर हजर होते.३०० लहान-मोठे उद्योग बंद पडण्याची भीतीऔरंगाबाद औद्योगिक वसाहतीत पॉलिमर्स उत्पादन करणारे ३०० पेक्षा अधिक युनिट आहेत. १० हजार टनपेक्षा अधिक पॉलिमर्सचे उत्पादन होते. यातही असंख्य प्रकार आहेत. यावर आधारित अनेक उद्योग आहेत. पॉलिमर्स उत्पादनावर बंदी आणल्याने सर्व उद्योग बंद पडतील. त्यामुळे हजारो लहान-मोठे उद्योगही बंद पडतील. बेरोजगारी वाढणार आहे. प्लास्टिकच्या उत्पादन व विक्रीवर राज्यात बंदी आणली आहे, पण परराज्यांत नाही. यामुळे राज्यातील सर्व उद्योग परराज्यांत स्थलांतरित होतील.भरत राजपूत, अध्यक्ष, मराठवाडा प्लास्टिक अ‍ॅण्ड ट्रेडर्स असोसिएशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPlastic banप्लॅस्टिक बंदीStrikeसंप