शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शहराचे तापमान दहा दिवसांत २७ वरून गेले ३१ अंश सेल्सिअसवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:18 IST

सप्टेंबरमध्येच नागरिकांना आॅक्टोबर हीट अनुभवावी लागत आहे.

ठळक मुद्दे- शहरातील तापमानात दररोज वाढ- पाऊस नसल्याने होत आहे वाढ - पंखे, कूलरची भासतेय गरज

औरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, सप्टेंबरमध्येच नागरिकांना आॅक्टोबर हीट अनुभवावी लागत आहे. शहरातील तापमान गेल्या दहा दिवसांत २७ वरून ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

शहर आणि परिसरात तब्बल महिनाभरानंतर १६ आॅगस्ट रोजी जोरदार पाऊस बरसला होता; परंतु त्यानंतर पावसाने पुन्हा काढता पाय घेतला. पावसाची नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. आकाशात ढगांची गर्दीही होत नसल्याने भर पावसाळ्यात शहरात दररोज उन्हाचे चटके जाणवत आहेत.

पावसाळ्याच्या तीन महिन्यांत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये शहराचे तापमान साधारण ३० अंश असते. परंतु यंदा पावसाअभावी ११ सप्टेंबर रोजी ३२.६ अंश तर गुरुवारी ३१.२ अंश इतक्या तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. दहा दिवसांत ३.३ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे. जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत तुरळक पाऊस राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले होते. आता आणखी आठ दिवस मोठा पाऊस होणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास आगामी काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आर्द्रता झाली कमीशहरात आणखी आठ दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. पावसाअभावी आर्द्रता कमी झालेली आहे. त्यामुळे कमाल तापमानातही वाढ झालेली आहे. - श्रीनिवास औंधक र, संचालक , खगोलशास्त्र विभाग,  एमजीएम, औरंगाबाद

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण