शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शहर पाणीपुरवठ्याची सूत्रे आता सुनील केंद्रेकरांकडे; कामचुकारांना गुन्हे नोंदवण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:06 IST

काम केले नाही तर गुन्हे नोंदवण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे

औरंगाबाद: शहरातील पाणीपुरवठ्याची सूत्रे शासनाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हाती सोपविली आहेत. विभागीय आयुक्तांनी उपाययोजनेच्या अनुषंगाने हर्सूल, नक्षत्रवाडी एमबीआर, नवीन योजनेतील जलवाहिनी उत्पादन, फारोळा जलशुद्धिकरण प्रकल्पातील अडचणी शुक्रवारी समजून घेत महत्त्वाच्या सूचना केल्या.

सूचनेप्रमाणे येत्या काही दिवसांत निर्णय झाले नाहीतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त केंद्रेकर यांनी नक्षत्रवाडी एमबीआर बैठकीत दिला. एमजेपीचे अभियंता अभयसिंह, मनपाचे अभियंता किरण धांडे, पंडित, हेमंत कोल्हे, समीर जोशी आदींची यावेळी उपस्थिती होती.

चार दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न सुरू आहेत. २४ एप्रिलपासून शासनाच्या आदेशाने केंद्रेकर यांनी पाणीपुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून एमआयडीसी, हर्सूल तलावातील पाणी पूर्ण क्षमतेने मिळाल्यास चार दिवसाआड शहराला पाणी देणे शक्य होणार आहे. जुनी जलवाहिनी, गळत्या, उपसा पंप, एमबीआरची साठवण क्षमता याचा आढावा घेतल्यानंतर अनेक त्रुटी आयुक्तांच्या समोर आल्या.

मनाला येईल तशा नियोजनामुळे बट्ट्याबोळमनला वाटेल तसे जलवाहिनीचे जाळे वाढवित गेल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिडको-हडकोचे पाणी हर्सूलपर्यंत जात आहे, मग या भागांना पाणी कुठून मिळणार. जुन्या शहरातील पाणी सोयीनुसार वळविल्यामुळे शहागंज व परिसरात पाणी जात नसल्याचे बैठकीत समोर आले. त्यावर हर्सूल तलावातील पाणी वापरण्याचा निर्णय झाला आहे. एमबीआर (साठवण जलकुंभ) येथील तांत्रिक बदलाच्या सूचना आयुक्तांनी केल्या तसेच १५० एचपीचा पंप बसविणे, नवीन एमबीआरची उंची वाढविणे, हर्सूल तलावातील दोन्ही शुध्दिकरण केंद्र चालू केल्यानंतर पाणीपुरवठ्यात मोठा बदल अपेक्षित असल्याचे आयुक्त म्हणाले.

हर्सूल जलवाहिनीत हंडे व गाळशहरात पाणीटंचाई असतांना हर्सूल तलावातील जलउपसा वाहिन्यांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. त्यात रांजण, हंडे व इतर गाळ अडकून पडल्यामुळे १२ ऐवजी फक्त ३ एमएलडी पाणी जात होते. जलवाहिनी स्वच्छ केल्यामुळे आता ६ एमएलडी पाणी वाढले आहे. दुर्लक्षामुळे शुद्धिकरण बंद पडले होते. ते सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. एमआयडीसी, हर्सूल, नहर-ए-अंबरी आणि जायकवाडी असे चार स्त्रोत असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने केंद्रेकर यांनी यंत्रणेची खरडपट्टी केली.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका