शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

शहर पाणीपुरवठ्याची सूत्रे आता सुनील केंद्रेकरांकडे; कामचुकारांना गुन्हे नोंदवण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:06 IST

काम केले नाही तर गुन्हे नोंदवण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे

औरंगाबाद: शहरातील पाणीपुरवठ्याची सूत्रे शासनाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हाती सोपविली आहेत. विभागीय आयुक्तांनी उपाययोजनेच्या अनुषंगाने हर्सूल, नक्षत्रवाडी एमबीआर, नवीन योजनेतील जलवाहिनी उत्पादन, फारोळा जलशुद्धिकरण प्रकल्पातील अडचणी शुक्रवारी समजून घेत महत्त्वाच्या सूचना केल्या.

सूचनेप्रमाणे येत्या काही दिवसांत निर्णय झाले नाहीतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त केंद्रेकर यांनी नक्षत्रवाडी एमबीआर बैठकीत दिला. एमजेपीचे अभियंता अभयसिंह, मनपाचे अभियंता किरण धांडे, पंडित, हेमंत कोल्हे, समीर जोशी आदींची यावेळी उपस्थिती होती.

चार दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न सुरू आहेत. २४ एप्रिलपासून शासनाच्या आदेशाने केंद्रेकर यांनी पाणीपुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून एमआयडीसी, हर्सूल तलावातील पाणी पूर्ण क्षमतेने मिळाल्यास चार दिवसाआड शहराला पाणी देणे शक्य होणार आहे. जुनी जलवाहिनी, गळत्या, उपसा पंप, एमबीआरची साठवण क्षमता याचा आढावा घेतल्यानंतर अनेक त्रुटी आयुक्तांच्या समोर आल्या.

मनाला येईल तशा नियोजनामुळे बट्ट्याबोळमनला वाटेल तसे जलवाहिनीचे जाळे वाढवित गेल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिडको-हडकोचे पाणी हर्सूलपर्यंत जात आहे, मग या भागांना पाणी कुठून मिळणार. जुन्या शहरातील पाणी सोयीनुसार वळविल्यामुळे शहागंज व परिसरात पाणी जात नसल्याचे बैठकीत समोर आले. त्यावर हर्सूल तलावातील पाणी वापरण्याचा निर्णय झाला आहे. एमबीआर (साठवण जलकुंभ) येथील तांत्रिक बदलाच्या सूचना आयुक्तांनी केल्या तसेच १५० एचपीचा पंप बसविणे, नवीन एमबीआरची उंची वाढविणे, हर्सूल तलावातील दोन्ही शुध्दिकरण केंद्र चालू केल्यानंतर पाणीपुरवठ्यात मोठा बदल अपेक्षित असल्याचे आयुक्त म्हणाले.

हर्सूल जलवाहिनीत हंडे व गाळशहरात पाणीटंचाई असतांना हर्सूल तलावातील जलउपसा वाहिन्यांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. त्यात रांजण, हंडे व इतर गाळ अडकून पडल्यामुळे १२ ऐवजी फक्त ३ एमएलडी पाणी जात होते. जलवाहिनी स्वच्छ केल्यामुळे आता ६ एमएलडी पाणी वाढले आहे. दुर्लक्षामुळे शुद्धिकरण बंद पडले होते. ते सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. एमआयडीसी, हर्सूल, नहर-ए-अंबरी आणि जायकवाडी असे चार स्त्रोत असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने केंद्रेकर यांनी यंत्रणेची खरडपट्टी केली.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका