शहरं
Join us  
Trending Stories
1
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
4
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
5
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
6
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
7
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
8
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
9
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
10
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
11
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
12
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
13
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
14
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
16
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
17
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
18
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
19
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
20
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

सिटी गेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:04 IST

इथल्या पायाभूत सुविधा, दळणवळण, पर्यटन विकास, औद्योगिक विकास, स्थानिकांच्या आणि व्यावसायिकांच्या अपेक्षा, बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्राच्या अडचणी, दीर्घ काळापासून ...

इथल्या पायाभूत सुविधा, दळणवळण, पर्यटन विकास, औद्योगिक विकास, स्थानिकांच्या आणि व्यावसायिकांच्या अपेक्षा, बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्राच्या अडचणी, दीर्घ काळापासून प्रलंबित स्थानिक मुद्दे या सर्वांना नवनिर्माणाची ओढ लागली आहे. कोरोनाने गांजलेल्या स्थितीला आता नवचैतन्याची आस आहे.

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद शहर. पैठणी, हिमरू शाल आणि ऐतिहासिक स्थापत्यकलेचा वारसा जपणारे, ५२ दरवाजांचे शहर. वेरूळ, अजिंठा लेण्या, घृष्णेश्वर मंदिर, दौलताबाद किल्ला, सोनेरी महाल, बीबीका मकबरा, पाणचक्की अशी अद्भुत स्थळे आणि त्यामागील इतिहास उराशी बाळगून नव्या काळाला सामोरे जाणारे शहर. खाद्य संस्कृती जपणारे, अनेक जाती धर्मांच्या संस्कृतींचा संगम घडवणारे शहर, अशी औरंगाबादची ख्याती आहे.

अनेक देशांत अगदी छोटीशी पर्यटनस्थळे इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने जगासमोर सादर केले जातात की, त्यावर तिथली अर्थव्यवस्था चालते. आपली ऐतिहासिक स्थळे तर फार उच्च दर्जाची, अत्यंत अनोखी आणि अद्वितीय आहेत.

मात्र योग्य मार्केटिंग न झाल्याने, त्यांचे महत्त्व व क्षमता नीट न कळाल्याने मोठे नुकसान होत गेले. इथल्या पर्यटनाला चालना देऊन अर्थव्यवस्थेची गाडी रुळाला लावण्यासाठी तज्ज्ञ, संवेदनशील आणि झोकून देत काम करणाऱ्या व्यक्तींची नितांत आवश्यकता आहे.

सक्षम, कार्यशील, दूरदर्शी आणि शहराबद्दल आस्था असणारे नेतृत्व, राज्य आणि केंद्र शासनाने पुरेसा निधी देऊन पायाभूत सुविधा निर्माण करणे, शहराला रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने सुव्यवस्थितपणे जोडणे, शहरातील आणि पर्यटनस्थळाकडील रस्ते दर्जेदार करणे, पिण्याचे पाणी, आपत्कालीन सुविधा, स्वच्छतागृहे तयार करणे आवश्यक आहे. पर्यावरण अनुकूल विकासात लोकसहभाग, खासगी आणि सरकारी संस्थांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे.

पर्यटनाबरोबर इथे हॉटेल आणि खाद्य उद्योग, वाहतूक व सर्वच स्थानिक उद्योगांना चालना मिळेल. रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यावसायिक वृद्धी शहराला समृद्धी देईल.

किमान दिवसाआड पाणीपुरवठा, अखंडित वीजपुरवठा, दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा अन्य शैक्षणिक संस्था, सर्व वैद्यकीय सेवा पुरवणारी मोठी रुग्णालये या सुविधा खरे तर प्राथमिक आहेत. ही औरंगाबादची पहिली गरज आहे.

इथल्या एमआयडीसी आणि डीएमआयसीमध्ये मोठ्या उद्योगांचे येणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योजक संघटना, स्थानिक राजकीय नेते, प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. सुदैवाने राज्याचे उद्योगमंत्री हेच आपले पालकमंत्री आहेत.

शहराजवळच ड्राय पोर्ट तयार होते आहे. समृद्धी, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाने आपली कनेक्टिव्हिटी वाढते आहे. पण विमानतळाला आंतरराष्ट्रीय बनवणे आवश्यक आहे. परदेशातील पर्यटक आणि उद्योजक त्यांच्या शहरातून थेट इथे आले पाहिजेत.

इथल्या बांधकाम व्यवसायाने रोजगार निर्मिती, शासनाला महसुली उत्पन्न, स्थानिक उद्योगांना चालना, शहर विकासात योगदान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांना जास्तीत जास्त किफायतशीर किमतीत घरे, दुकाने, कार्यालये उपलब्ध करून दिली.

शहराच्या पायाभूत आणि पर्यटन अनुकूल विकासासोबतच बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

रेरा कायद्यात व्यवसायाला अनुकूल आणि न्याय्य बदल करून तो कायदा लोकाभिमुख करायला हवा. कोरोनामुळे हजारो प्रकल्प पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रकल्पपूर्तीसाठी मुदतवाढ देणे अत्यावश्यक आहे. सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि संबंधित सर्व प्राधिकरणे रेराअंतर्गत समाविष्ट करणे काळाची गरज आहे.

बांधकाम साहित्य वेगाने महाग झाल्याने बांधकामाचा खर्च दीड पट झाला आहे. मजुरी व विजेच्या दर वाढलेत. सरकार सवलत देत नाही. मात्र घरांच्या किंमती वाढवता येत नाहीत. निदान ओपन कार पार्किंग विकण्याची परवानगी असली पाहिजे.

या सगळ्यांचा समन्वय घडवून आणल्यास दिवस बदलतील आणि उज्ज्वल भविष्याची नांदी होईल. आता नवे दोन केंद्रीय राज्यमंत्री यासाठी वेगाने सकारात्मक पावले उचलतील अशी अपेक्षा आहे.

नितीन बगाडिया

वास्तुविशारद तथा नगररचना तज्ज्ञ

संचालक, प्राइड ग्रुप

अध्यक्ष, क्रेडाई, औरंगाबाद