शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

शहर कचराप्रश्नी प्रशासनाचा आता इंदौर अभ्यास दौरा; पालकमंत्रांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:54 IST

सध्या देशात इंदौर सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जात आहे. तेथील प्रशासन कशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी, नवीन येणारे मनपा आयुक्त व महापौर इंदौरला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

औरंगाबाद : सध्या देशात इंदौर सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जात आहे. तेथील प्रशासन कशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी, नवीन येणारे मनपा आयुक्त व महापौर इंदौरला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

वाल्मी येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर शहरातील कचरा प्रश्नावर पालकमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी खा.चंद्रकांत खैैरे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. सावंत यांनी सांगितले की, शहरातील २५० ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. याशिवाय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणखी ४ युनिट उभारण्यात येणार आहे. कचऱ्यापासून राख तयार करण्यासाठी अंबुजा कंपनीशी बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत शहरातील कोणत्याही रस्त्यावर कचरा दिसणार नाही, याचे नियोजन मनपाने केले आहे. येत्या दोन महिन्यांत शहर स्वच्छ व सुंदर बनेल, अन्य शहरांसमोर एक आदर्श बनेल, असा आशावादही डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादguardian ministerपालक मंत्रीdr. deepak sawantदीपक सावंत