शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बीड शहर पाच तास अंधारात

By admin | Updated: April 8, 2016 00:28 IST

बीड : ढगाळ वातावरण आणि वाऱ्याला सुरूवात होताच शहरातील वीज गायब होणार याची धास्ती नागरिकांना कायम आहे. सध्या बीड विभाग भारनियमनमुक्त

बीड : ढगाळ वातावरण आणि वाऱ्याला सुरूवात होताच शहरातील वीज गायब होणार याची धास्ती नागरिकांना कायम आहे. सध्या बीड विभाग भारनियमनमुक्त असतानाही दिवसकाठी ४ ते ५ तास वीज गायब असल्याने नागरिक त्रस्त आहेत. धानोरा रोडवरील उपकेंद्रातील स्प्रिंग चार्ज नसल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला होता. त्यामुळे बीडकरांना सबंध रात्र जागून काढावी लागली होती. ग्रामीण भागाबरोबरच शहरातीलही महावितरणची दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. त्यामुळेच वाऱ्याला आणि पावसाला सुरूवात होताच वीज गायब होणार हा अलिखित नियम झाला आहे. असे असतनाही विभागाकडून दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटदारांची बिले रखडल्याने दुरूस्ती कामे देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे लहान-मोठ्या अडचणीमुळे शहरातील वीजपुरवठा तासन्तास खंडित करण्याची नामुष्की येत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात व परिसरात अवकाळी पाऊस होत आहे. वाऱ्यामुळे जागोजागी विद्युत तारांवर झाडाच्या फांद्या पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वर्षभरापासून निधीअभावी महावितरणची दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. गत महिन्यात वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांच्या दारी खेटे मारणारे हेच अधिकारी - कर्मचारी आज अरेरावीची भाषा करीत आहेत. दुरूस्तीच्या कामावर अधीक्षक अभियंता यांचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचा कडाका आणि त्यातच वीज गायब असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अधिकच्या कामाचा भार येथील कर्मचाऱ्यावर असल्याने सेवेवरही परिणाम होत आहे. एका वायरमनकडे तब्बल १० ते १५ रोहित्रांचा भार आहे. क्षुल्लक कारणांसाठी शहरात वीजपुरवठा खंडित होत आहे. याचे गांभीर्य ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे ना कंत्राटदारांना, ग्राहक मात्र त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)