शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

औरंगाबाद शहर होणार आणखी स्मार्ट; अतिरिक्त एक हजार कोटींसाठी शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 19:06 IST

शहरी भागात गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर आयोगाच्या शिफारशीत लक्ष वेधण्यात आले.

ठळक मुद्देदेशातील आठ शहरांत औरंगाबादचे स्थानअतिरिक्त एक हजार कोटींसाठी १५व्या वित्त आयोगात शिफारस

औरंगाबाद : केंद्र सरकारचा स्मार्ट सिटी प्रकल्प पाच वर्षांकरिता असल्यामुळे मार्च २०२२ मध्ये या प्रकल्पाची मुदत संपणार असली तरी औरंगाबाद शहराचे भाग्य आणखी उजाळणार आहे.

स्मार्ट सिटी मिशनच्या पुढील टप्प्यांकरिता केंद्रीय वित्त आयोगाने सन २०२१-२०२६ या पाच वर्षांकरिता केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात नवीन शहरांच्या निर्माणासाठी देशातील निवडक आठ शहरांना प्रत्येकी एक हजार कोटी देण्याची शिफारस केली आहे. त्यात औरंगाबादचा समावेश आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात १५व्या वित्त आयोगातून नवीन शहर निर्माणासाठी केंद्रीय नगरविकास खात्याने प्रश्नोत्तरांत बोलताना आठ शहरांत औरंगाबादचे नाव असल्याचे स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत केलेल्या कामाच्या मोजमापावर औरंगाबादचा समावेश झाला आहे. ग्रीनफिल्ड (उपलब्ध असलेल्या सुविधांना अद्ययावत करणे, विस्तार करणे) अंतर्गत हा आयोगाकडून निधी मिळेल. राज्यातील नाशिक शहराचाही यात समावेश आहे.

केंद्र सरकारने २५ जून २०१५ रोजी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. त्यात चार फेऱ्यांमध्ये एकूण १०० शहरांची निवड झाली. प्रत्येक शहरासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित होता. ५० टक्के वाटा केंद्र, २५ टक्के राज्य सरकार आणि उर्वरित २५ टक्के वाटा स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलायचा होता. स्मार्ट शहर बस, सफारी पार्क, एमएसआय प्रकल्प, जीआयएस मॅपिंग आदी प्रकल्प स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात येत आहेत. आगामी पाच वर्षांत वित्त आयोगाकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास हे शहर आणखी स्मार्ट होईल. विकास आराखडा, झालर क्षेत्र हद्दीत विस्ताराबाबत नवीन प्रस्तावात विचार होणे शक्य आहे.

अधिकृत आदेश आलेले नाहीतमहापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, १५व्या वित्त आयोगाने केंद्र सरकारला नवीन शहर निर्माणासाठी औरंगाबादला अतिरिक्त एक हजार कोटी रुपये देण्याची बाब स्वागतार्ह आहे. स्मार्ट सिटी योजनेत चांगले काम केल्याचीही पावती आहे; परंतु या संदर्भातील कोणतेही अधिकृत आदेश अद्याप आलेले नाहीत.

आयोगाच्या अहवालातील शिफारसशहरी भागात गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर आयोगाच्या शिफारशीत लक्ष वेधण्यात आले. शहरीकरणाकडे कल वाढल्याने नवीन शहरांची उभारणीची गरज आहे. ग्रीनफिल्ड शहरांची स्थापना, भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या परिस्थितीनुसार प्रायोगिक तत्त्वावर मोजक्या आठ शहरांची निवड केली आहे. पुढील पाच वर्षांत निवड केलेल्या शहरांना अनुदान मिळणे शक्य आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका