शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
3
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
4
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
5
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
6
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
7
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
8
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
9
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
10
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
11
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
12
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
13
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
14
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
15
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
16
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
17
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
18
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
19
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
20
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

औरंगाबाद शहर होणार आणखी स्मार्ट; अतिरिक्त एक हजार कोटींसाठी शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 19:06 IST

शहरी भागात गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर आयोगाच्या शिफारशीत लक्ष वेधण्यात आले.

ठळक मुद्देदेशातील आठ शहरांत औरंगाबादचे स्थानअतिरिक्त एक हजार कोटींसाठी १५व्या वित्त आयोगात शिफारस

औरंगाबाद : केंद्र सरकारचा स्मार्ट सिटी प्रकल्प पाच वर्षांकरिता असल्यामुळे मार्च २०२२ मध्ये या प्रकल्पाची मुदत संपणार असली तरी औरंगाबाद शहराचे भाग्य आणखी उजाळणार आहे.

स्मार्ट सिटी मिशनच्या पुढील टप्प्यांकरिता केंद्रीय वित्त आयोगाने सन २०२१-२०२६ या पाच वर्षांकरिता केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात नवीन शहरांच्या निर्माणासाठी देशातील निवडक आठ शहरांना प्रत्येकी एक हजार कोटी देण्याची शिफारस केली आहे. त्यात औरंगाबादचा समावेश आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात १५व्या वित्त आयोगातून नवीन शहर निर्माणासाठी केंद्रीय नगरविकास खात्याने प्रश्नोत्तरांत बोलताना आठ शहरांत औरंगाबादचे नाव असल्याचे स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत केलेल्या कामाच्या मोजमापावर औरंगाबादचा समावेश झाला आहे. ग्रीनफिल्ड (उपलब्ध असलेल्या सुविधांना अद्ययावत करणे, विस्तार करणे) अंतर्गत हा आयोगाकडून निधी मिळेल. राज्यातील नाशिक शहराचाही यात समावेश आहे.

केंद्र सरकारने २५ जून २०१५ रोजी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. त्यात चार फेऱ्यांमध्ये एकूण १०० शहरांची निवड झाली. प्रत्येक शहरासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित होता. ५० टक्के वाटा केंद्र, २५ टक्के राज्य सरकार आणि उर्वरित २५ टक्के वाटा स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलायचा होता. स्मार्ट शहर बस, सफारी पार्क, एमएसआय प्रकल्प, जीआयएस मॅपिंग आदी प्रकल्प स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात येत आहेत. आगामी पाच वर्षांत वित्त आयोगाकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास हे शहर आणखी स्मार्ट होईल. विकास आराखडा, झालर क्षेत्र हद्दीत विस्ताराबाबत नवीन प्रस्तावात विचार होणे शक्य आहे.

अधिकृत आदेश आलेले नाहीतमहापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, १५व्या वित्त आयोगाने केंद्र सरकारला नवीन शहर निर्माणासाठी औरंगाबादला अतिरिक्त एक हजार कोटी रुपये देण्याची बाब स्वागतार्ह आहे. स्मार्ट सिटी योजनेत चांगले काम केल्याचीही पावती आहे; परंतु या संदर्भातील कोणतेही अधिकृत आदेश अद्याप आलेले नाहीत.

आयोगाच्या अहवालातील शिफारसशहरी भागात गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर आयोगाच्या शिफारशीत लक्ष वेधण्यात आले. शहरीकरणाकडे कल वाढल्याने नवीन शहरांची उभारणीची गरज आहे. ग्रीनफिल्ड शहरांची स्थापना, भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या परिस्थितीनुसार प्रायोगिक तत्त्वावर मोजक्या आठ शहरांची निवड केली आहे. पुढील पाच वर्षांत निवड केलेल्या शहरांना अनुदान मिळणे शक्य आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका