शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आठ- दहा दिवसांच्या पाणीफेरीने नागरिक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:25 IST

शहरातील सर्वात जुनी आणि मध्यवर्ती भाग असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा भागात आठ ते दहा दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे. कधी कधी १२ व्या दिवशीही पाणी येते. आलेले पाणी पूर्ण दाबाने नसल्यामुळे पिण्याचेही पाणी भरले जात नाही, अशा तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देनवाबपुरा-गवळीपुरा : प्रशासनाचे दुर्लक्ष; मागणी केली तरीही समस्या सुटेना

औरंगाबाद : शहरातील सर्वात जुनी आणि मध्यवर्ती भाग असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा भागात आठ ते दहा दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे. कधी कधी १२ व्या दिवशीही पाणी येते. आलेले पाणी पूर्ण दाबाने नसल्यामुळे पिण्याचेही पाणी भरले जात नाही, अशा तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या.महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा वॉर्डामध्ये पाण्याच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. आठ- दहा दिवसाला पाणी येते. जे येते तेही कमी दाबाने येते, त्यामुळे पाणी साठविण्यासाठी घरात असलेली साधनेही भरून घेता येत नाहीत, अशी तक्रार या भागातील रहिवासी धीरज पवार यांनी केली. याविषयी कितीही तक्रारी केल्या तरीही समस्या काही सुटत नाही. याच वॉर्डातील गवळीपुऱ्यातील काही घरांना तर पाणीच पोहोचत नसल्याचे धीरज पवार यांनी स्पष्ट केले. नितेश पट्टेकर म्हणाले, पाण्याच्या समस्यामुळे सगळेच जण हैराण आहेत. अनेकांना महापालिकेच्या टाकीवरून पाणी भरून आणावे लागते. यात स्त्रियांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ऋतुराज कोठुळे म्हणाले, आठ-दहा दिवसाला येणारे पाणीही आमच्या काही घरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अनेकांना पिण्याचेही पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी न मिळणाºया घरांकडे प्रशासनासह पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे. त्याकडे सर्वांनीच लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणीही कोठुळे यांनी केली. बाळूभाऊ नामागवळी म्हणाले, पाणी येत नाही. जे आले ते कमी दाबाने येते. यात टँकरही महापालिका पाठवून देत नाही. महिलांना हंड्याने पाणी आणावे लागते. शहराच्या मध्यवस्तीत नागरिकांना असा त्रास सहन करावा लागत आहे. गवळीपुºयामधील किरण भगत म्हणाले, आठ-दहा दिवसाला येणाºया पाण्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागते. छोट्या टँकरसाठी ५५० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या टँकरचा दर हा ७०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हे पैसे कोठून आणायचे हा प्रश्न पडतो, असेही भगत यांनी सांगितले. पाणीटंचाईविषयी नगरसेवक फेरोज खान यांना विचारले असता, त्यांनी वॉर्डात दहा ते बारा दिवसाला पाणी येते. तीन-चार दिवसाला पाणी येण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली. आंदोलने केली आहेत. तरीही प्रशासन हालत नाही. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दखल घेत नाहीत. पाण्याच्या टाकीसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्यासुद्धा सोडविण्यात येत नाहीत, त्यामुळे पाणीपुरवठा मागील वर्षभरापासून विस्कळीत झालेला आहे. यात प्रशासन दोषी आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई