शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

आठ- दहा दिवसांच्या पाणीफेरीने नागरिक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:25 IST

शहरातील सर्वात जुनी आणि मध्यवर्ती भाग असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा भागात आठ ते दहा दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे. कधी कधी १२ व्या दिवशीही पाणी येते. आलेले पाणी पूर्ण दाबाने नसल्यामुळे पिण्याचेही पाणी भरले जात नाही, अशा तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देनवाबपुरा-गवळीपुरा : प्रशासनाचे दुर्लक्ष; मागणी केली तरीही समस्या सुटेना

औरंगाबाद : शहरातील सर्वात जुनी आणि मध्यवर्ती भाग असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा भागात आठ ते दहा दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे. कधी कधी १२ व्या दिवशीही पाणी येते. आलेले पाणी पूर्ण दाबाने नसल्यामुळे पिण्याचेही पाणी भरले जात नाही, अशा तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या.महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा वॉर्डामध्ये पाण्याच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. आठ- दहा दिवसाला पाणी येते. जे येते तेही कमी दाबाने येते, त्यामुळे पाणी साठविण्यासाठी घरात असलेली साधनेही भरून घेता येत नाहीत, अशी तक्रार या भागातील रहिवासी धीरज पवार यांनी केली. याविषयी कितीही तक्रारी केल्या तरीही समस्या काही सुटत नाही. याच वॉर्डातील गवळीपुऱ्यातील काही घरांना तर पाणीच पोहोचत नसल्याचे धीरज पवार यांनी स्पष्ट केले. नितेश पट्टेकर म्हणाले, पाण्याच्या समस्यामुळे सगळेच जण हैराण आहेत. अनेकांना महापालिकेच्या टाकीवरून पाणी भरून आणावे लागते. यात स्त्रियांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ऋतुराज कोठुळे म्हणाले, आठ-दहा दिवसाला येणारे पाणीही आमच्या काही घरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अनेकांना पिण्याचेही पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी न मिळणाºया घरांकडे प्रशासनासह पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे. त्याकडे सर्वांनीच लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणीही कोठुळे यांनी केली. बाळूभाऊ नामागवळी म्हणाले, पाणी येत नाही. जे आले ते कमी दाबाने येते. यात टँकरही महापालिका पाठवून देत नाही. महिलांना हंड्याने पाणी आणावे लागते. शहराच्या मध्यवस्तीत नागरिकांना असा त्रास सहन करावा लागत आहे. गवळीपुºयामधील किरण भगत म्हणाले, आठ-दहा दिवसाला येणाºया पाण्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागते. छोट्या टँकरसाठी ५५० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या टँकरचा दर हा ७०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हे पैसे कोठून आणायचे हा प्रश्न पडतो, असेही भगत यांनी सांगितले. पाणीटंचाईविषयी नगरसेवक फेरोज खान यांना विचारले असता, त्यांनी वॉर्डात दहा ते बारा दिवसाला पाणी येते. तीन-चार दिवसाला पाणी येण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली. आंदोलने केली आहेत. तरीही प्रशासन हालत नाही. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दखल घेत नाहीत. पाण्याच्या टाकीसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्यासुद्धा सोडविण्यात येत नाहीत, त्यामुळे पाणीपुरवठा मागील वर्षभरापासून विस्कळीत झालेला आहे. यात प्रशासन दोषी आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई