शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोला आता मिळणार पाचव्या दिवशी पाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 16:43 IST

मनपाच्या नियोजनाचे यश

ठळक मुद्देपाण्यासाठी चार महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने झाली. शहरातील अनेक वॉर्डांना पाचव्या दिवशीसिडको-हडकोला आठव्या दिवशी पाणी मिळत असे

औरंगाबाद : सिडको-हडकोसह चिकलठाण्यापर्यंतच्या अनेक वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून चक्क आठव्या, दहाव्या दिवशी पाणी देण्यात येत होते. या भागातील नागरिकांची प्रचंड ओरड लक्षात घेऊन मनपाचे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री सिडको एन-५, एन-७ आणि चिकलठाणा येथील जलकुंभ अनेक वर्षांनंतर प्रथमच तुडुंब भरले. या चमत्कारामुळे सिडको-हडकोला आता पाचव्या दिवशी पाणी देणे सहज शक्य होणार आहे.

सिडको-हडको आणि जालना रोडवरील काही वॉर्डांना यंदा उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. पाण्यासाठी चार महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने झाली. पावसाळा सुरू झाला तरी या भागातील पाणी प्रश्न जशास तसा होता. अखेर राज्यमंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. मनपा आयुक्तांची भेट घेऊन समान पाणी वाटपाची सूचना त्यांनी केली. शहरातील अनेक वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी तर सिडको-हडकोला आठव्या दिवशी पाणी का? असा प्रश्न सावे यांनी उपस्थित  केला होता. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दोन दिवसांत नियोजन करण्याचे आश्वासन दिले होते.

शहर अभियंता एस.डी. पानझडे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. मागील चार ते पाच दिवसांपासून पानझडे यांनी सूक्ष्म नियोजन केले. नक्षत्रवाडीहून एन-५ पर्यंत येणाऱ्या एक्स्प्रेस लाईनवर ठिकठिकाणी मोठे कनेक्शन देण्यात आले आहेत. शिवाजीनगर, पुंडलिकनगर, एसएफएस जलकुंभावरील अनेक वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. तीन दिवसाआड पाणी मिळणाऱ्या वॉर्डांना आता चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासून करण्यात आली. त्यामुळे सिडको-हडकोतील तिन्ही जलकुंभ तुडुंब भरले. आता सिडको-हडकोला चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.टँकरच्या फक्त ७० फेऱ्या घटल्या शहर परिसरातील बोअर आटल्यामुळे टँंकरची मागणी वाढत होती. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे काही बोअरला पाणी आले असून, टँकरची मागणी घटत आहे. रोजच्या ७० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. ५१ टँकरद्वारे ५५० फेऱ्या आजही सुरू आहेत.

जायकवाडी धरणात काम सुरूचजायकवाडी धरणात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करताना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने सोमवारपासून आपत्कालीन अ‍ॅप्रोच चॅनलच्या ठिकाणी खोदकाम सुरू केले. डाव्या कालव्यापर्यंत जास्तीत जास्त पाणी आणण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम तीन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. सध्या एक पोकलेन, एक जेसीबी व दोन ट्रकच्या मदतीने काम सुरू आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणcidcoसिडको