शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

स्वत:च्या घरातही होतात मुलांवर अत्याचार; युनिसेफच्या सर्वेक्षणात धक्कादायक बाबी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:56 IST

राज्यातील ५ हजार मुला-मुलींचा सर्वेक्षण सहभाग

ठळक मुद्दे२५ टक्के मुलांना आईकडून मारहाण. ११.१६ टक्के मुलांची आरोग्य काळजी घेतली जात नाही.

औरंगाबाद : मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचे स्वरूप कसे आहे, याचा मागोवा घेण्यासाठी युनिसेफची महाराष्ट्र शाखा, नाईन इज माईन आणि मुंबई स्माईल यांनी संयुक्तपणे राज्यव्यापी सर्वेक्षण (संशोधन अभ्यास) केले. यात ८ जिल्ह्यांंतील १३ ते १७ वयोगटातील ५ हजार मुला-मुलींनी सहभाग घेतला. त्यातून घरातही मुलांवर विविध प्रकारे अत्याचार होत असल्याचे पुढे आल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

युनिसेफच्या प्रकल्पप्रमुख अलका गाडगीळ, मास्टर ट्रेनर पांडुरंग सुदामे, सुजाता शिरके, रुचा सतूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. घराबाहेर होणारी लैंगिक हिंसा, अत्याचार, मारहाण, खून यावरच अधिक लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, घरामध्येही मुलांवर हिंस्त्र हल्ले सुरू आहेत. शाळांमध्ये विविध प्रकारे अत्याचार होतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. मुलांची शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा याबरोबर आर्थिक हिंसा, दुर्लक्षपणातूनही हिंसा केली जात आहे. घरामध्ये हातात जे काही असेल ते फेकून मारणे, लाथा-बुक्क्यांनी तुडवणे, गरम पळीचा डाग देणे, असे प्रकार होतात. घरासह शाळा, शाळेबाहेरील संस्थेतही अनेक प्रकार होतात. याविषयी आवाज उठविण्याची आणि जनजागृतीची गरज असल्याचे गाडगीळ म्हणाल्या. सुजाता शिरके म्हणाल्या, घरांमध्ये सतत भांडण होत असलेली मुलेही हिंसेकडे वळतात. काही मुलांच्या समुपदेशनातून या बाबी समोर आल्याचे त्या म्हणाल्या. 

प्रत्येक बाळाचे ४ हक्कपांडुरंग सुदामे म्हणाले, गर्भधारणेपासून तर प्रसूतीनंतरची दोन वर्षे म्हणजे १ हजार दिवस बाळासाठी महत्त्वाची आहेत. या कालावधीत बाळाच्या मेंदूची सर्वाधिक वाढ होत असते. प्रत्येक बाळाचे हे ४ हक्क आहेत : १) जन्मल्यानंतर पहिल्या ५ मिनिटांत बाळाचा आईच्या गालाशी स्पर्श झाला पाहिजे आणि तासाभरात आईचे दूध पाजले पाहिजे. २) पहिली ६ महिने आईचे दूध पाजले पाहिजे. ३) पहिल्या ६ महिन्यांनंतर घरगुती पोषक आहार आणि दोन वर्षांपर्यंत आईचे दूध पाजणे. ४) बाळाला खाऊ घालताना त्याच्याशी संवाद साधवा.

घरातील अत्याचाराचे स्वरूप- २५ टक्के मुलांना आईकडून मारहाण.- २१ टक्के मुलांना वडिलांकडून मारहाण.- ११.६ टक्के मुले घरी नाखुश.- ६.७३ टक्के मुलांना घरी असुरक्षित वाटते.- २५ टक्के मुलांसोबत थोबाडीत मारण्याचा प्रकार.- १७ टक्के मुलांना मारहाण.- ६ टक्के मुलांना लाथ मारण्याचा प्रकार.-  २ टक्के मुलांना चटके देण्याचा प्रकार- ११.१६ टक्के मुलांची आरोग्य काळजी घेतली जात नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी