शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

"मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती देशभक्ती, मग माझी गैरहजेरी राष्ट्रद्रोह का?"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:51 IST

जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील यांची मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी गैरहजर राहण्याची परंपरा यंदाही कायम राहिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिल्याचा खा. जलील यांचा आरोपरझाकारी विचारांनी भारलेल्यांनी देशभक्ती शिकविण्याची गरज नाही

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांची ऑनलाईन हजेरी देशभक्ती, तर माझी गैरहजेरी राष्ट्रदोह का? असे सवाल करणारे टष्ट्वीट खा. इम्तियाज जलील यांनी केले आहे. 

जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील यांची मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी गैरहजर राहण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. खा. जलील हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत; परंतु त्यांनी टिष्ट्ववटरद्वारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्यकरून शिवसेनेला डिवचले आहे.  पहिल्या टष्ट्वीटमध्ये ते म्हणतात, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना प्रश्न का करीत नाहीत. यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो, तर दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये ते म्हणतात, मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि माध्यम गप्प का आहेत? 

सिद्धार्थ उद्यानातील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर खा. जलील यांच्या विरोधात काही तरुणांनी जोरदार  घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध केला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: कार्यक्रमाला येणे अपेक्षित असताना त्यांनीही आॅनलाईन संदेश देत विभागाच्या भावनांचा अवमान केला, असा आरोप करीत युवक घोषणा देत होते. मराठवाडा विकास मंच या संघटनेच्या दत्तात्रय जांभूळकर, सागर शिंदे, गोविंद देशपांडे यांनी मुख्यमंत्री आणि जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

आजवर सतत गैरहजर राहिले खा. जलील२०१५ पासून इम्तियाज जलील हे लोकप्रतिनिधी आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून मे २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले तरी त्यांनी मराठवाड मुक्तिसंग्राम दिनाला एकदाही हजेरी लावली नाही. जलील हे एमआयएम या पक्षाचे नेतृत्व करतात, हैदराबादस्थीत एमआयएमचे ध्येयधोरण निजाम धार्जीने असल्याने  ते या कार्यक्रमाला हजर राहत नसल्याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जातो. 

रझाकारी विचारांनी भारलेल्यांनी देशभक्ती शिकविण्याची गरज नाहीठाकरे यांना खा. जलील यांच्यासारख्या रझाकारी विचारांनी भारलेल्यांनी देशभक्ती शिकविण्याची गरज नाही.  मागील पाच वर्षांपासून ते या कार्यक्रमाला गैरहजर राहत आहेत. खा. जलील यांनी टष्ट्वीटद्वारे शुभेच्छा दिल्या असत्या, तर त्या सर्वांनी स्वीकारल्या असत्या. सोशल मीडियातून असे व्यक्त होणे हीदेखील रझाकारी पद्धतच आहे. त्यांच्या पक्षाचा विचार जगाला माहिती आहे. गैरहजर राहून जलील यांनी रझाकारी दाखविली आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी खा. जलील यांना दिले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेImtiaz Jalilइम्तियाज जलीलMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद