शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरेगाव-भीमा येथील घटनेस मुख्यमंत्री जबाबदार; आपच्या प्रीती मेनन यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:53 IST

कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला.

ठळक मुद्दे कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच जर दलित बांधवांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत दोषींवर कारवाईचे आदेश दिले असते, तर महाराष्ट्रात उद्रेक झाला नसता, असे मत व्यक्त करीत त्यांनी भाजप, संघावर टीका केली. 

औरंगाबाद : कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच जर दलित बांधवांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत दोषींवर कारवाईचे आदेश दिले असते, तर महाराष्ट्रात उद्रेक झाला नसता, असे मत व्यक्त करीत त्यांनी भाजप, संघावर टीका केली. 

राज्यातील भाजप सरकारला शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे, त्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना अटक करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकणार नाहीत,अशी टीका करीत फडणवीस सरकारने जे सिंचन प्रकल्प विरोध करीत रोखले होते, ते सर्व प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा सरकारने केल्याचे मेनन  यांनी नमूद केले. सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीनिमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाची पूर्वतयारी व पाहणी करण्यासाठी प्रीती मेनन आल्या होत्या. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.

गेल्या काही दिवसांपासून कुमार विश्वाससह पक्षातील काही जुने नेते हे पक्षाच्या कार्यपद्धतीवर आरोप करीत आहेत, याबद्दल विचारले असता, मेनन  म्हणाल्या की, हे सर्वच पक्षांत असते; मात्र प्रत्येकाला पक्षाच्या ध्येयधोरणानुसार वागावे लागते, तसे केले नाही तर स्वत: बाहेर पडावे लागते किंवा पक्ष त्यांना बाहेर काढतो़  अण्णा हजारे जर आमच्या सोबत आले तर चांगलेच होईल, पण ते राजकारणापासून दूर आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रातील विकास आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी त्यांची भेट घेत सहकार्य करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

१२ जानेवारी रोजी घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात आम आदमी पार्टी लवकरच सक्रिय होणार आहे़  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ उमेदवार उभे करणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय प्रवेशाची सुरुवात सिंदखेडराजापासून होईल़  १२ जानेवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर होणार्‍या सभेत ते महाराष्ट्रात आप सक्रिय होण्याची घोषणा करतील. जिल्हानिहाय कार्यकर्त्यांचे जाळे उभे करून आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २४५ जागा लढण्याची पक्षाची तयारी आहे़  

टॅग्स :AAPआपAurangabadऔरंगाबादMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार