शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

छावा मराठा युवा संघटनेचा रुम्हणे मोर्चा

By admin | Updated: December 31, 2014 01:01 IST

जालना : शेतकऱ्यांना दुष्काळी पॅकेज तात्काळ द्या, या प्रमुख व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मंगळवारी शासकिय विश्रामगृहावर रूम्हणे काढण्यात आला

जालना : शेतकऱ्यांना दुष्काळी पॅकेज तात्काळ द्या, या प्रमुख व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मंगळवारी शासकिय विश्रामगृहावर रूम्हणे काढण्यात आला. दरम्यान, विश्रामगृहात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना या संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले. गांधीचमन येथून निघालेल्या या मोर्चात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत पॅकेज तात्काळ मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली. बऱ्याच आंदोलकांच्या हातात रुम्हणे होते. कर्जमाफी, नव्याने कर्ज पुरवठा, हेक्टरी अनुदान, फळबागांना विशेष पॅकेज, वीज बिल, पाणीपट्टी, शैक्षणिक शुल्क माफ करणे, सर्व प्रकारची सिंचनाची कामे हाती घेणे, मजुरांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्या मांडल्या. मोर्चा शनिमंदिर, नूतन वसाहत उड्डाणपूल, अंबड चौफुली मार्गे शासकिय विश्रामगृहावर पोहोचला. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर आंदोलकांसमोर बोलताना नानासाहेब जावळे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत न केल्यास मंत्र्यांची गाडी रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशाराही दिला. या आंदोलनात नानासाहेब जावळे, भीमराव मराठे, विजय घाडगे, अप्पासाहेब कुढेकर, विलास उढाण, देवकर्ण वाघ, गणेश पघळ, राधाकिसन शिंदे, गायकवाड, विलास कोल्हे, शिंदे, पंकज जऱ्हाड, विजय शिंदे, मच्छिंद्र घोगरे, शरद बोबडे, संतोष जाधव, मोरे, सतीश कुढेकर, शिरसाठ, उफाड, खोजे, कोकणे, गुजर, मिसाळ आदी सहभागी झाले होते. या मोर्चानिमित्त पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)