शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

असेही गाव, जेथे १०० वर्षांत ना कोणी घरासमोर मंडप उभारला ना लग्न लावले; रंजक आहे कारण

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 20, 2023 15:38 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गावात ‘नो बॅंड बाजा बराती’

छत्रपती संभाजीनगर : सर्वत्र लग्नसराईची धुमधाम सुरू आहे. गावागावातही भले मोठे मंडप टाकून धुमधडाक्यात लग्न पार पडत आहे. मात्र, पैठण तालुक्यातील ‘हिवरा चौंढाळा’ या गावात मात्र, मागील १०० वर्षांत कोणी घरासमोर मंडप उभारलेला किंवा लग्न लावलेले नाही. याचा अर्थ या गावात सर्व अविवाहित आहेत असे नाही. गावाच्या वेशीबाहेर जाऊन हनुमान मंदिराच्या साक्षीने लग्न लावले जातात. पण गावात कोणी लग्न लावण्याचे धाडस करीत नाही.

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल... मात्र, हे तेवढेच सत्य आहे. छत्रपती संभाजीनगर शहराकडून ‘बीड’ कडे जाताना ७० कि.मी अंतरावर ‘हिवरा चोंढाळा’ हे गाव आहे. या गावात श्रीक्षेत्र माहूरच्यादेवीचे उपपीठ आहे. येथे दगडी चिरेबंदी वाडा असून मंदिरही संपूर्ण दगडात बनविले आहे. गाभाऱ्यात चार बाय चार फुटांचा देवीचा तांदळा (मुखवटा) आहे. पाषाणातील हा तांदळा शेंदूर रंगाचा व देवीचे डोळे मोठ्या आकारातील आहे. ही देवी अविवाहित आहे. यामुळे तिचा आदर करण्यासाठी किंवा तिचा कोप होऊ नये यासाठी गावकरी गावात लग्न लावत नाही, घरासमोर मंडप उभारत नाही. गावाच्या दीड ते दोन कि.मी. वेशीबाहेर लग्न लावतात. हे मंदिर सुमारे ५०० पेक्षा अधिक वर्षांचे आहे, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले. पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जात आहे.

बाळंतीणसुद्धा झोपते जमिनीवरहिवरा चोंढाळातील देवीच्या मंदिरापेक्षा घराची उंची जास्त असू नये, यासाठी गावातील श्रीमंत असो वा गरीब कोणीही घरावर पहिला मजला बांधत नाही. सर्वजण तळमजल्यावरच राहतात. तसेच देवीची कोणी बरोबरी करू नये यासाठी सर्व जण जमिनीवर झोपतात. पलंगाचा वापर कोणी करीत नाही. बाळांतीणसुद्धा जमिनीवरच झोपते. आजपर्यंत मी कोणाला गावात लग्न लावताना पाहिले नाही.- सत्यभामा करताडे, गावातील १०० वर्ष वयाच्या आजी

लग्न लावल्यावरच नवरदेव गावात पाऊल ठेवतोगावातील तरुणीचे बाहेर गावातील तरुणाशी लग्न जुळले. तर लग्नाच्या दिवशी नवरदेव हिवरा चोंढाळा गावात पाऊल ठेवत नाही. थेट वेशीबाहेरील मंगल कार्यालयात वरात जाते. लग्न लागल्यानंतर नवरा-नवरी जोडीने गावात येतात व देवीचे दर्शन घेतात.

गावकऱ्यांची श्रद्धादेवीला लग्न करायचे नव्हते, पण दैत्यराजाने बळजबरीने लग्नाचा प्रयत्न केला. त्यावेळीस देवीचा कोप झाला व दैत्यराजाने आणलेले वऱ्हाडी दगडात रूपांतर झाले म्हणून गावाच्या आसपास लहान-मोठे असंख्य दगड दिसतात, अशी कथा पूर्वजांनी सांगितली. यामुळे कोणी गावात लग्न लावत नाही. वेशीबाहेर लग्न करतात. गावात आज ७०० लोकसंख्या आहे. देवीचे मंदिर पुरातन आहे.- कमलाकर वानोळे, पूजाअर्चा, देखभाल करणाऱ्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिकmarriageलग्न