शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा; क्वीक सर्व्हेच्या आडून भाजपने वाढविला शिंदेसेनेवर दबाव

By विकास राऊत | Updated: April 8, 2024 11:47 IST

गुढीपाडवा महायुतीत कुणासाठी ठरणार गोड, याकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. या जागेवर शिंदेगट लढणार, हे जवळपास स्पष्ट असताना क्वीक सर्व्हेच्या आडून भाजपने शिंदेसेनेवर दबाव वाढविला आहे. या सर्व्हेच्या आधारे औरंगाबाद, नाशिक आणि रत्नागिरी मतदारसंघाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा भाजपला आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीनंतर औरंगाबाद मतदारसंघ शिंदेसेनेला सुटणार, हे जवळपास निश्चित झाले होते. पालकमंत्री संदिपान भुमरे हेच लढणार, असा निरोप कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे. शिंदेसेनेने प्रचार कार्यालयाची देखील तयारी सुरू केली असून, भाजपच्या स्थानिक मंत्र्यांना, नेत्यांना भुमरे यांना चहापानाला पहिल्यांदाच बोलाविले होते. त्या चर्चेत उमेदवार कुणी असो, महायुती म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन भुमरे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला केले. या सगळ्या घडामोडीनंतर भाजप नेते अस्वस्थ झाले, त्यांनी वरिष्ठांकडे जागा भाजपला सुटावी, अशी मागणी केली. त्यानंतर भाजपने क्वीक सर्व्हे (तातडीची पाहणी) केला. सर्व्हेमध्ये शिंदेसेनेकडील इच्छुक आणि भाजपातील इच्छुकांच्या नावानुसार सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्न विचारण्यात आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

भाजपातील इच्छुकांना ‘क्वीक सर्व्हे’ एवढी एकच शेवटची अपेक्षा असून, त्यावरच त्यांची मदार आहे. मराठवाड्यातील सर्व जागांचे वाटप झाले आहे. फक्त औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ उमेदवार आणि पक्ष जाहीर होणे बाकी आहे. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या जागेसह रत्नागिरी, नाशिक जागेचाही निर्णय होईल. पाडवा महायुतीत कुणाला गोड ठरेल, याकडे लक्ष लागले आहे. रविवारची रात्र आणि सोमवारचा पूर्ण दिवस महायुतीमध्ये बैठकीचे चर्चासत्र चालणार आहे. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार असल्यामुळे शिंदेसेनेने सध्या तरी सबुरीची भूमिका घेतली आहे.

पक्ष स्थापनेदिनी भाजपचे मंथन?६ एप्रिल रोजी भाजपचा पक्षस्थापना दिन होता. कुलस्वामिनी मंगल कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंथन झाले. या बैठकीत औरंगाबाद मतदारसंघ भाजपला सुटावा, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नेत्यांना साकडे घातले. वरिष्ठांशी बोलू, मागणी करू, एवढाच शब्द नेते पदाधिकाऱ्यांना देऊ शकले.

क्वीक सर्व्हे काय सांगतो?‘क्वीक सर्व्हे’मध्ये शिंदेसेना ११ टक्के, भाजप १५ टक्के, अपक्ष ९ टक्के असे विश्लेषण भाजप नेत्यांपर्यंत आले होते. याआधारे काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना