शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आमचं शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले? संजय शिरसाटांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:42 IST

'ही घडवून आणलेली दंगल आहे, असा माझा आरोप आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं, हे शहराच्या शांततेसाठी योग्य नाही.'

छत्रपती संभाजीनगर: आज राम नवमी आहे, याला गालबोट लावण्याचा प्रयत्न शहरात झाला आहे. शहरातील किराडपुरा परिसरात असलेल्या राम मंदिराजवळ काल मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटाकून दगडफेक आणि जाळपोळीची घटना झाली. या घटनेत पोलिसांच्या गाड्यासह इतर अनेक गाड्या जाळण्यात आल्या. या घटनेनंतर शहरातील पूर्व मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पेट्रोल बॉम्ब कुठून आले? मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले, 'इम्तियाज जलील यांनी ज्याप्रकारे स्टेटमेंट दिलं, त्याचा परिणाम युवा वर्गावर झाला आहे. आज कोणी कितीही नकार देत असले, तरी एका विशिष्ट युवा वर्गाने हे घडवून आणलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, समाजात तेढ निर्माण करू नका. या घटनेची सुरुवात दोन गटात झाली, मग अवघ्या अर्ध्या तासात यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले? अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब तयार होतात?' असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

आमचं शहर हिटलिस्टवरते पुढे म्हणाले, 'आमचं शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. भारतात ज्या अतिरेकी कारवाया होतात, त्यात आमच्या शहराचे नाव आहे. याच्याकडे पोलिसांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला शहराची शांतता बिघडवायची नाही. सध्या रमजानचा महिना सुरू आहे, आज रामनवमी आहे आणि लवकरच जैन समाजाचा उत्सवर आहे. अशा परिस्थितीत शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. मी याबाबत पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशीबी बोललो. त्यांनी सांगितलं की, यात कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

घडवून आणलेली दंगल'ही घडवून आणलेली दंगल आहे, असा माझा आरोप आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं, हे शहराच्या शांततेसाठी योग्य नाही. अंबादास दानवेंनी मूर्खासारख स्टेटमेंट करू नये. राम नवमी हिंदूंचा सण आहे आणि याच सणावेळी आम्ही घडनू आणू, हे अतिशय मूर्खपणाचे स्टेटमेंट आहे. तुम्हाला बोलायला येत नाही, तर बोलू नका. उगाच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न नका करू. या घटनेत जो दोषी आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो शिंदे गटाचा असो, ठाकरे गटाचा असो किंवा इतर कुणीही असो. ही राजकारण करण्याची वेळ नाही,' असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाटImtiaz Jalilइम्तियाज जलीलPoliceपोलिसMumbaiमुंबई