शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एकाच महिन्यात छत्रपती संभाजीनगर मनपा मालामाल; मालमत्ता कर, पाणीपट्टीतून ३२ कोटी वसूल

By मुजीब देवणीकर | Updated: May 2, 2024 16:27 IST

निवडणुकीमुळे अनेक वॉर्ड कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व्यस्त आहेत. निवडणूक संपल्यावर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून तब्बल ३२ कोटी रुपये प्राप्त झाले. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २ लाख ३० हजार मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी मोबाइलवर मेसेज गेले. त्यामुळे नागरिकांनी व्याजाची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर भरला. याशिवाय मनपाने राबविलेले सप्त तारांकित धोरणही लोकप्रिय ठरत आहे. मालमत्ता करातून ३० दिवसात २५ कोटी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ३ कोटी रुपये प्राप्त झाले.

कर निर्धारक व संकलक तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘अबकी बार ५०० पार’ घोषणा केली आहे. त्या दृष्टीने एप्रिल महिन्यापासूनच वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. वसुलीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सप्ततारांकित धोरण राबविण्यात येत आहे. यात ऑनलाइन कर भरणे, निवासी मालमत्तेच्या ठिकाणी वृक्षारोपण, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग, सोलारचा वापर, ई-वाहन किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर, मालमत्तेचे सहमालक म्हणून महिलेचे नाव असेल तर त्यांना मालमत्ता करात १० टक्के, ८ टक्के आणि ६ टक्के सवलत दिली जात आहे. सात किंवा पाच स्टार घेणाऱ्या मालमत्ताधारकांना सवलत दिली जाणार आहे.

निवडणुकीमुळे अनेक वॉर्ड कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व्यस्त आहेत. निवडणूक संपल्यावर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. १ ते ३० एप्रिलपर्यंत मनपाच्या तिजोरीत ३२ कोटी २० लाख ७७ हजार ८५१ रुपये जमा झाले. मालमत्ताधारकांनी कराच्या पोटी २५ कोटी ६५ लाख ७० हजार २०८ रुपयांचा भरणा केला. पाणीपट्टीचे ३ कोटी २५ लाख ८९ हजार ४९५ रुपये वसूल झाले. इतर विभागाच्या कराची वसुली ३ कोटी २९ लाख १८ हजार १४८ रुपये इतकी झाली आहे. मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची २९ कोटी रुपयांपर्यंत वसुली होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे उपायुक्त थेटे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर