शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत

By बापू सोळुंके | Updated: May 11, 2024 20:20 IST

शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविणारा आणि तर महागाईवर आवाज उठविणारा खासदार आम्हाला हवा असल्याचे मत, महिलांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडण्यासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सिडको एन ४ येथे आयोजित केलेल्या ''''चाय पे चर्चा'''' उपक्रमात सहभागी महिला नवा खासदार कसा हवा, यावर व्यक्त झाल्या. बहुतेक महिलांनी त्यांच्या मुलांना नोकरीच्या शोधात पुणे, मुंबईसह परप्रांतात जावे लागते. यामुळे येथील डीएमआयसीमध्ये नवीन उद्योग खेचून आणणारा खासदार हवा असल्याचे सांगितले. आयआयटी, आयआयएम, एम्स सारख्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्था शहरात आणण्यासाठी प्रयत्न करणारा खासदार गरजेचा असल्याचे नमूद केले. शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविणारा आणि तर महागाईवर आवाज उठविणारा खासदार आम्हाला हवा असल्याचे मत, व्यक्त केले. काय म्हणाल्या महिला?

राष्ट्रीय शैक्षणिक संस्था हव्याआजवरच्या खासदारांनी शहरासाठी केंद्रातील कोणती मोठी संस्था येथे आणली? आयआयटी, आयआयएम आणि एम्स सारख्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्था येथे आणण्यासाठी भांडणारा खासदार आम्हाला हवा आहे. येथे चांगल्या शैक्षणिक संस्था नसल्याने येथील पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या शहरात पाठवावे लागते. बऱ्याचदा त्याचा खर्च त्यांना परवडत नाही.- डॉ. मनीषा मराठे. सामाजिक कार्यकर्त्या.

बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहेएमआयडीसीमध्ये मोठे उद्योग खेचून आणणाऱ्या खासदारांची गरज आम्हाला आहे. कारण येथे आयटी हब नाही. आयटी उद्योग येथे असते तर येथील इंजिनिअर्संना पुणे, मुंबई, बेंगळुरू सारख्या शहरात नोकरीसाठी जावे लागले नसते. डीएमआयसी असूनही तेथे एकही मोठा उद्योग आला नाही, याची खंत वाटते. परिणामी मतदारसंघातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. - दीपाली जाधव. ब्युटिशिअन. 

अंकुश ठेवणारा खासदार हवाशहर नुसतेच आकाराने मोठे झाले आहे. येथे आधी रस्ता तयार केला जातो, नंतर ड्रेनेजसाठी रस्ता खोदला जातो, याचा जनतेला मोठा त्रास होतो. अशाप्रकारे ढिसाळ कारभारावर अंकुश ठेवणारा खासदार हवा आहे.- सविता मराठे, गृहिणी.

पिण्याच्या पाण्याचा सोडवाशहराच्या पिण्याच्या पाण्याचा मागील २५ वर्षांपासून प्रश्न जैसे थे आहे. पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविणारा खासदार हवा आहे. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मूकमोर्चा काढला. मात्र केंद्राने समाजाची दखल घेतली नाही. मराठा आरक्षणावर संसदेत आवाज उठविणारा खासदार हवा आहे.- कल्पना साखळे, सामाजिक कार्यकर्त्या.

महागाईने सामान्य जनता त्रस्तशेती मालाला हमी भाव मिळत नाही, म्हणून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या अधिक होत आहे. खते, बियाणे यावरील जीएसटी रद्द करून त्यांना दिलासा देणारा खासदार हवा आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. - दीपाली पिंगळे, गृहिणी.

महिलांचे आर्थिक गणितच बिघडले दहा वर्षांपूर्वी गॅस सिलिंडरचे दर ३०० रुपये होते. आज तीनपट दर वाढले आहे. यासोबतच प्रत्येक वस्तूवर जीएसटी द्यावा लागतो. यामुळे महिलांचे आर्थिक गणितच बिघडले आहे. वाढत्या महागाईवर आवाज उठविणारा तसेच शहरात रोजगार उपलब्ध करणारा खासदार आम्हाला हवा आहे.- स्वाती शिंदे, नोकरदार महिला

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या.- २० लाख ३५ हजार २३महिला मतदारांची संख्या- ९ लाख ८१ हजार ७७३ 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४