शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्गाला ‘ग्रीन सिग्नल’; दिल्ली २५० 'किमी'ने जवळ येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:40 IST

या रेल्वे मार्गाच्या ‘फायनल लोकेशन सर्व्हे’साठी रेल्वे मंत्रालयाने २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित आणि गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव या ९३ कि.मी. च्या रेल्वे मार्गाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. या रेल्वे मार्गाच्या ‘फायनल लोकेशन सर्व्हे’साठी रेल्वे मंत्रालयाने २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबरोबर धाराशिव-बीड- छत्रपती संभाजीनगर या २४० कि.मी. रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कामाचा खर्च आणि मिळणारा परतावा, हे कारण पुढे करून छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच ठेवला जात असल्याची ओरड होत आहे. ‘लोकमत’ने १२ ऑगस्ट २०२४ रोजी ‘छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वेमार्गाचे काय?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यापूर्वीही वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. अखेर या रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मुहूर्त मिळाला आहे.

१६० कि.मी.चा फेरा थांबेलदिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेंना आजघडीला मनमाडहून जावे लागत आहे. या रेल्वे मनमाडहून चाळीसगाव आणि जळगावमार्गे उत्तर भारताकडे जातात. छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगाव रेल्वेने जाण्यासाठी आजघडीला हा १६० कि.मी.चा प्रवास करण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ जातो. छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव असा ९३ किलोमीटरचा रेल्वे मार्ग झाल्यानंतर, मनमाड न जाता थेट रेल्वे गाड्या चाळीसगावला पोहोचतील. प्रवाशांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय टळेल.

रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावाधाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर हा रेल्वेमार्गही कागदावरच राहिला. बीडचे खा. बजरंग सोनवणे यांनी या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. सोनवणे यांना एका पत्राद्वारे या मार्गासंदर्भात माहिती दिली. या नवीन रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत, असे रेल्वेमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले. त्यानंतर आता या रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

दिल्लीचे अंतर २५० कि.मी.ने होईल कमीछत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वेमार्गाने दिल्लीचे अंतर २५० कि.मी.ने कमी होईल. उत्तर-दक्षिण भारताला जोडणारी ही रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल. आता लवकरात लवकर हे अंतिम सर्वेक्षण पूर्ण केले पाहिजे.- डाॅ. अण्णासाहेब शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय महामार्ग ५२ व छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नियोजित रेल्वेमार्ग संघर्ष समिती

अनेक वर्षे संघर्षछत्रपती संभाजीनगर : चाळीसगावमार्गे कन्नड या रेल्वेलाइनसाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. धाराशिव-बीड- छत्रपती संभाजीनगर व छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव या रेल्वेमार्गामुळे दक्षिण ते उत्तर भारत जोडला जाणार आहे.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

उत्तर-दक्षिण व्यापारी मार्गहे दोन्ही रेल्वेमार्ग झाल्यावर मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. सातवाहन काळातील उत्तर-दक्षिण व्यापारी मार्ग परत जन्म घेणार आहे, ही मराठवाड्यासाठी आनंद वार्ता आहे.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरrailwayरेल्वे