शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाळूज एमआयडीसीत हातमोज्याच्या कंपनीला भीषण आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 07:35 IST

Maharashtra Gloves Manufacturing Factory Fire: आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते.

Maharashtra Gloves Manufacturing Factory Fire ( Marathi News ) छत्रपती संभाजीनगमधील एमआयडीसीमध्ये हातमोजे बनविणाऱ्या शनिवारी मध्यरात्री २ वाजता भीषण आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

या आगीने ३ वाजता रौद्र रूप धारण केले. यात १५ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, ६ कर्मचाऱ्यांना घाटी रुग्णालयात बेशुद्धावस्थेत हलविण्यात आले होते. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक वसाहतीमधील २१५-१६ सेक्टरमध्ये हँड ग्लोव्हज तयार करणारा सनशाईन इंटरप्राईज हा कारखाना आहे. यात २०० हून अधिक कर्मचारी काम करतात. शनिवारी मध्यरात्री रच्या सुमारास कंपनीत मोठा स्फोट झाला. काय झाले, हे कळायच्या आत कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघण्यास सुरुवात झाली. काही क्षणात कंपनीला आगीने वेढले. 

वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्याला आग लागली असून कामगार अडकल्याचे स्थानिकांनी कळविले होते. आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते. कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, इमारतीत सहा कर्मचारी अडकले आहेत. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इक्बाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, अग्निशमन विभागाचे वैभव बाकडे यांनी धाव घेतली. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण १ वाजून २० मिनिटांनी कंपनीला आग लागल्याची माहिती मिळाली, अग्निशमन विभागाने धाव घेईपर्यंत कंपनीला चहूबाजूंनी आगीने वेढले होते. आग वाढेपर्यंत जवळपास १६ ते १८ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आग विझविण्याचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितले. 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल