शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

'प्राध्यापकांनो, आठ दिवसांत पाचशे उत्तरपत्रिका तपासा'; परीक्षा संचालकांचे आदेश

By राम शिनगारे | Updated: January 3, 2024 14:25 IST

३० दिवसांत निकाल जाहीर करण्यासाठी उचलले पाऊल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी चार जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर दाखल झाल्या आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आठ दिवसांत किमान ५०० उत्तरपत्रिका तपासण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिले आहेत. त्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आवाहनही संचालकांनी केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार ३० दिवसांत निकाल जाहीर करावेत अशी तरतूद आहे. या तरतुदीचे पालन करणे विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालय, अध्यापकांना बंधनकारक आहे. कुलपती व राज्य शासनाकडून वारंवार विद्यापीठांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व्यक्तिश: लक्ष घालून मूल्यांकनाच्या कामासाठी प्राध्यापकांनी ८ दिवस सहभाग नोंदवित स्वत:च्या विषयाच्या किमान ५०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. त्यासाठी प्राचार्यांनी प्राध्यापकांना मेसेज, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून कार्यमुक्त न करता महाविद्यालयाच्या लेटरहेडवर संबंधित प्राध्यापकांना कार्यमुक्त करावे आणि त्या आदेशाची एक प्रत मूल्यांकन केंद्रात जमा करावी, असेही परीक्षा संचालक डॉ. गवळी यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील जिल्ह्यातच मूल्यांकनजालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका इतर जिल्ह्यातील मूल्यांकन केंद्रांवर तपासण्यासाठी पाठविण्यात येत होत्या. मात्र, आता जालना जिल्ह्यातील उत्तरपत्रिका जालना जिल्ह्यात असलेल्या मूल्यांकन केंद्रांवर पाठविण्यात आल्याची माहिती आहे. एका प्राध्यापकाकडे तर त्याच्या महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा ही बाब उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले.

चार जिल्ह्यात १५ मूल्यांकन केंद्रविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५, बीड ५, धाराशिव २ आणि जालना जिल्ह्यातील ३ मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिका तपासण्यात येत आहेत.

विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना कामाला लावाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी कधीही मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी संबंधित प्राध्यापकांना प्राचार्यांनी अधिकृतपणे कार्यमुक्त केले पाहिजे. त्याचवेळी परीक्षा विभागाने विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही हाच नियम लागू करावा आणि त्यांच्याकडून मूल्यांकन करून घेतले पाहिजे.- डॉ. रविकिरण सावंत, सदस्य, व्यवस्थापन परिषद, प्राध्यापक गट

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण