शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'प्राध्यापकांनो, आठ दिवसांत पाचशे उत्तरपत्रिका तपासा'; परीक्षा संचालकांचे आदेश

By राम शिनगारे | Updated: January 3, 2024 14:25 IST

३० दिवसांत निकाल जाहीर करण्यासाठी उचलले पाऊल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी चार जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर दाखल झाल्या आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आठ दिवसांत किमान ५०० उत्तरपत्रिका तपासण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिले आहेत. त्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आवाहनही संचालकांनी केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार ३० दिवसांत निकाल जाहीर करावेत अशी तरतूद आहे. या तरतुदीचे पालन करणे विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालय, अध्यापकांना बंधनकारक आहे. कुलपती व राज्य शासनाकडून वारंवार विद्यापीठांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व्यक्तिश: लक्ष घालून मूल्यांकनाच्या कामासाठी प्राध्यापकांनी ८ दिवस सहभाग नोंदवित स्वत:च्या विषयाच्या किमान ५०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. त्यासाठी प्राचार्यांनी प्राध्यापकांना मेसेज, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून कार्यमुक्त न करता महाविद्यालयाच्या लेटरहेडवर संबंधित प्राध्यापकांना कार्यमुक्त करावे आणि त्या आदेशाची एक प्रत मूल्यांकन केंद्रात जमा करावी, असेही परीक्षा संचालक डॉ. गवळी यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील जिल्ह्यातच मूल्यांकनजालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका इतर जिल्ह्यातील मूल्यांकन केंद्रांवर तपासण्यासाठी पाठविण्यात येत होत्या. मात्र, आता जालना जिल्ह्यातील उत्तरपत्रिका जालना जिल्ह्यात असलेल्या मूल्यांकन केंद्रांवर पाठविण्यात आल्याची माहिती आहे. एका प्राध्यापकाकडे तर त्याच्या महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा ही बाब उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले.

चार जिल्ह्यात १५ मूल्यांकन केंद्रविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५, बीड ५, धाराशिव २ आणि जालना जिल्ह्यातील ३ मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिका तपासण्यात येत आहेत.

विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना कामाला लावाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी कधीही मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी संबंधित प्राध्यापकांना प्राचार्यांनी अधिकृतपणे कार्यमुक्त केले पाहिजे. त्याचवेळी परीक्षा विभागाने विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही हाच नियम लागू करावा आणि त्यांच्याकडून मूल्यांकन करून घेतले पाहिजे.- डॉ. रविकिरण सावंत, सदस्य, व्यवस्थापन परिषद, प्राध्यापक गट

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण