शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एकशिक्षकी शाळेच्या परदेशी शाळांसोबत गप्पागोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 19:45 IST

जिल्हा परिषद बजाजगेट शाळेची भरारी

ठळक मुद्देऑक्टोबरमध्ये शाळेला सुरुवात१२ वरून ३२ विद्यार्थ्यांपर्यंत मजल

- राम शिनगारे 

औरंगाबाद : बजाजगेट परिसरातील जि. प. शाळेत आठ महिन्यांपूर्वी गुरे बांधली जात होती. खोल्यांना झाडाझुडपांनी वेढा घातलेला होता. घाणीचे साम्राज्य होते. दहा वर्षांपूर्वी बंद पडलेली ही शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा याच परिसरात १२ मुले शाळाबाह्य आढळली होती. त्यामुळे जि. प. प्रशासनाने ही शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. 

२१ ऑगस्ट २०१९ रोजी १२ विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या शाळेत शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच ३२ विद्यार्थी दाखल झाले असून, या शाळेतील विद्यार्थ्यांचा संवाद अमेरिका, मालदीवच्या विद्यार्थ्यांशी होत आहे. औरंगाबाद शहरापासून जवळच असलेल्या वळदगाव हद्दीमध्ये बजाजगेटसमोर काही वर्षांपूर्वी तीन खोल्यांची शाळा सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून बांधण्यात आली होती. ही शाळा कालांतराने बंद पडली. ती दहा वर्षांपासून बंद होती. बजाजगेट परिसरात राहणाऱ्या कामगारांनी ही शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्याकडे केली. त्यांनीही सकारात्मकता दाखवत तत्कालीन सीईओ पवनीत कौर यांच्याकडे हा विषय मांडला. 

या परिसरात १२ शाळाबाह्य मुले असल्याचेही सीईओंच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्यांनी शाळा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली. २१ ऑगस्ट २०१९ रोजी पहिली ते पाचवी ही सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा पुन्हा सुरू झाली. या शाळेत विजय लिंबोरे आणि नितीन अंतरकर या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. ही शाळा सुरू करतानाच शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी आंतरराष्ट्रीय शाळा बनविण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, काही दिवसांत तांत्रिक अडचणीमुळे नितीन अंतरकर यांना त्यांच्या मूळ शाळेत रुजू व्हावे लागले. तेव्हापासून विजय लिंबोरे हे एकमेव शिक्षक राहिले. या शिक्षकाने परिसरातील नागरिकांच्या मदतीने अवघ्या ८ महिन्यांत शाळेचा कायापालट केला. शासनाकडून एक रुपयाचीही मदत न घेता शाळा अत्याधुनिक केली. हे पाहून परिसरातील नागरिकांनी स्वत:ची मुले इंग्रजी शाळेतून काढून जि. प.च्या शाळेत टाकली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी विद्यार्थ्यांची संख्या १२ वरून ३२ वर पोहोचली आहे. ३२ विद्यार्थी हे इयत्ता दुसरी ते चौथीच्या वर्गातील आहेत.

आगामी शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीतील प्रवेशाला १ फेब्रुवारीपासून सुरुवात केली असून, आतापर्यंत १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती मुख्याध्यापक विजय लिंबोरे यांनी दिली.पाचवीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. चौथीत असणारे विद्यार्थी पाचवीत प्रवेश घेतील. आता दोन वर्गखोल्या असून, सीएसआर फंडातून जूनपर्यंत तीन खोल्या बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रत्येक वर्गात ३० प्रमाणे १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचेही लिंबोरे यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाची रेलचेल : विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रम चार महिन्यांतच पूर्ण झाला. त्यामुळे काही विद्यार्थी पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकतात. तर काही विद्यार्थी यू-ट्यूब, गुगल बोलो, हॅलो इंग्लिश अ‍ॅप, गुगल ट्रान्सलेट आदी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक माहिती घेत आहेत. विद्यार्थ्यांना ग्लोबल वार्मिंग, पाणी समस्या, काम करण्यासह भारतीय संस्कृतीतील सण, उत्सवही साजरे करतात. 

अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद : या. शाळेतील दुसरी ते चौथीतील १६ विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील व्हिलिंग शहरातील युजीन फिल्ड एलिमेट्री स्कूलमधील विद्यार्थ्यांशी ‘फूड विथ फ्रेंडस्’ या विषयावर भारतीय वेळेनुसार शुक्रवारी (दि.१४) रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत ‘इम्पाटिको’ तंत्रज्ञानावरून संवाद साधला. (अमेरिकेतील वेळ सकाळी ९.३० ते १०.३०) मालदीवसह इतर देशांतील शाळांच्या विद्यार्थ्यांशी ‘इम्पाटिको’सह झूम अ‍ॅप, स्काईपवरून काही वेळ संवाद साधला असल्याचेही मुख्याध्यापक विजय लिंबोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीdigitalडिजिटल