शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

सेलू येथील प्रमुख कार्यालयात प्रभारीराज!

By admin | Updated: May 31, 2014 00:26 IST

मोहन बोराडे, सेलू शहरातील महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असल्यातरी अनेक महिन्यांपासून प्रभारी अधिकार्‍यांवर कारभार सुरू आहे़

मोहन बोराडे, सेलू शहरातील महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असल्यातरी अनेक महिन्यांपासून प्रभारी अधिकार्‍यांवर कारभार सुरू आहे़ तसेच अनेक कार्यालयातील प्रमुख अधिकारी रजा घेवून बदलीच्या तयारीला लागले आहेत़ सेलू शहरातील पंचायत समिती, नगरपालिका, तहसील कार्यालय या प्रमुख कार्यालयातील गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व तहसीलदार प्रभारी आहेत़ राजकीय सत्तासंघर्षामुळे सेलू शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी हैराण झाले आहेत़ परिणामी बदलीच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे़ मागील एक वर्षापासून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत़ विशेष म्हणजे, गटविकास अधिकारी हे पद वर्ग १ चे असतानाही कार्यालयातीलच विस्तार अधिकारी तुळशीराम राठोड हे एक वर्षा पासून प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत़ पालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पाठक यांनी काही दिवसांपूर्वीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यामुळे इतर शहराच्या मुख्याधिकार्‍यांकडे सेलूचा पदभार देण्यात आला आहे़ या ठिकाणीही नवीन मुख्याधिकारी येण्यास इच्छुक नाहीत़ काही महिन्यांपूर्वीच सेलू येथे तहसीलदार म्हणून रूजू झालेले पांडुरंग माचेवाड हे निवडणूक संपताच रजेवर गेले आहेत़ दरम्यान, ते इतर ठिकाणी बदली करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे तहसीलदारपदाची धुरा नायब तहसीलदार संदीप यादव लोणीकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे़ पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत शिनगारे यांनी सेलू येथे तीन वर्षे सेवा बजावली आहे ते ही सुटीवर गेले असून परत येण्याची शक्यताही धुसर बनली आहे़ राजकीय हस्तक्षेप अनेक शासकीय कार्यालयात वाढत असल्यामुळे प्रमुख अधिकार्‍यांना काम करणे अवघड झाले आहे़ त्यामुळे अनेकवेळा प्रमुख अधिकारी पुढार्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्यामुळे सेलू येथे पदभार नकोच अशी भूमिका अधिकार्‍यांची दिसून आली आहे़ वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सतीश बाहेती यांच्या बदलीनंतर या ठिकाणीही प्रभारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ शहरातील प्रमुख कार्यालयात प्रभारी अधिकार्‍यांवर जवाबदारी सोपविण्यात आली आहे़ दरम्यान मर्जीतील अधिकारी असलेल्यांकडेच पदभार सोपविला जात असल्याची चर्चा आहे़शहरातील प्रमुख कार्यालयात प्रभारी अधिकारी असल्यामुळे अनेक कामे खोळंबतात़ विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही़ परिणामी विकासकामांनाही यामुळे खीळ बसते़ वर्षानुवर्षे प्रभारी अधिकारीच कार्यरत असल्यामुळे कार्यालयातील इतर कर्मचार्‍यांवर वचक राहत नाही़ त्यामुळे शासकीय कामकाज ढेपाळते़ दरम्यान, शहरातील प्रमुख कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी मिळावेत अशी मागणी नागरिकांची आहे़