शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

शहरात प्रशासनाचे ‘प्रभारी’राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:22 AM

शहरातील अनेक महत्त्वाची आणि मोठी पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार देऊन कामकाज चालवावे लागत आहे. या प्रभारी संस्कृतीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्नाने एका आयपीएस आणि एका आयएएस अधिकाऱ्याचा बळी घेतला. त्यानंतर शासनाने जिल्हाधिका-यांना महापालिकेचा तर विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. शासनाने ही तात्पुरती सोय केली असली तरी ‘प्रभारी’राज किती दिवस चालणार आहे. शहरातील अनेक महत्त्वाची आणि मोठी पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार देऊन कामकाज चालवावे लागत आहे. या प्रभारी संस्कृतीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.शहरातील कचरा प्रश्नाचा आगडोंब उसळताच राज्य शासन खडबडून जागे झाले. मिटमिटा दंगलप्रकरणी सर्वप्रथम पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. या घटनेला उलटून ४८ तासही होत नाही तोच महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची तडकाफडकी औैरंगाबाद वैधानिक विकास महामंडळात नेमणूक करण्यात आली. यादव यांचा पदभार पोलीस महानिरीक्षक भारंबेंकडे तर मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त ‘भार’जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सोपविला.या दोन्ही पदांवर शासन कायमस्वरूपी अधिकारी कधी नेमणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.निम्मी महापालिका प्रभारीवरशहरात ज्या पद्धतीने कचºयाचे डोंगर साचले आहेत, त्याच पद्धतीने महापालिकेत रिक्त पदांचा डोंगर वाढू लागला आहे. निम्मी महापालिका प्रभारी अधिका-यांवर चालत आहे. उपायुक्त महसूल, उपायुक्त सिडको, सहायक संचालक नगररचना, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मालमत्ता अधिकारी, कामगार अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, अतिक्रमण हटाव प्रमुख, स्थानिक संस्था कर अधिकारी, सांस्कृतिक अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी, क्रीडा अधिकारी.एसएससी बोर्डमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात मागील काही वर्षांपासून अध्यक्षपद रिक्त आहे. सुजाता पुन्ने सचिव म्हणून रिक्त पदावर काम पाहत आहेत. औरंगाबाद विभागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे मोठे काम मंडळातर्फे चालते.सिडको मुख्य प्रशासकसुनील केंद्रेकर यांची बदली झाल्यानंतर सिडकोचे मुख्य प्रशासकपद मागील दीड वर्षापासून रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.एमटीडीसीपर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक अधिकारीपद मागील सहा ते सात महिन्यांपासून रिक्त आहे. नाशिकचे प्रादेशिक अधिकारी मंडळावर अधूनमधून औरंगाबादला येऊन कामकाज पाहतात. पूर्वी या पदावर अण्णासाहेब शिंदे काम पाहत होते. पूर्वी येथे उपमहाव्यवस्थापक पद होते. ते पद रद्द करण्यात आले.