शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपडे पालटणाऱ़़़!

By admin | Updated: July 31, 2014 00:42 IST

संजय तिपाले, बीड कधी आरोग्य केंद्र बंद... कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती तर कधी औषध व उपचार साहित्यांचा अभाव... हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील निराशाजनक चित्र आता बदलणार आहे.

संजय तिपाले, बीडकधी आरोग्य केंद्र बंद... कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती तर कधी औषध व उपचार साहित्यांचा अभाव... हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील निराशाजनक चित्र आता बदलणार आहे. कारण आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ‘कायापालट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक कोटींचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सोहनिक यांच्या संकल्पनेतून कायापालट योजना पुढे आली आहे. पुणे जिल्ह्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही योजना राबविली जाईल. यातून ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पायाभूत सोयी व अद्ययावत साधने उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. सुशोभिकरण, लेक वाचवा मोहीम, कुपोषण निर्मूलन, माता- बाल आरोग्य असे विविध उपक्रम राबविण्यात येतील. शिवाय वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. जिल्हा प्रजनन व बालस्वास्थ्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी कायापालटसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. तो मंजुरीसाठी लवकरच सीईओ राजीव जवळेकर यांच्यापुढे ठेवला जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन डोईफोडे यांनी दिली.या सुविधांचा समावेश...कायापालटअंतर्गत प्राथमिक आरोग्य कें द्रांतील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. शस्त्रक्रियागृहात टाईल्स लावण्यात येतील, सूचनाफलक, औषधी तक्रार पेटी, विविध योजनांची माहिती दर्शवणारे फलक बसविले जातील. सर्व अधिकारी कर्मचारी ओळखपत्र वापरतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांना अ‍ॅप्रनचा सक्तीने वापरावे लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभिकरण केले जाणार आहे. रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था, अद्यावत प्रसूतीगृह आदी सुविधा देण्यात येतील. याशिवाय टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट करण्यासाठीही सोय केली जाईल. आरोग्य सुविधा उंचावतीलसीईओ राजीव जवळेकर म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सुविधांमध्ये सुधारणा करून ग्रामीण रुग्णांना अत्याधुनिक सोयी देण्याचा प्रयत्न आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये योजना सक्सेस झाली तर उपकेंद्रांमधूनही राबविता येईल, असेही त्यांनी सांगितले....तरच होेईल अंमलबजावणी जिल्ह्यात २९० उपकेंद्रे, ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ जिल्हा रुग्णालय, ४ ग्रामीण रुग्णालये, १ महिला रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालये आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, दांडीबहाद्दर अधिकारी- कर्मचारी यामुळे आरोग्य सुविधांची वाताहत आहे. अशा स्थितीत या योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.अत्याधुनिक सुविधा येतील; पण वैद्यकीय अधिकारीच मुख्यालयी थांंबले नाही तर या सुविधांचा रुग्णांना कितपत फायदा होईल ही शंकाच आहे.या ‘पीएचसीं’ची निवड...कायापालटसाठी प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर साधारणत: दहा लाख रुपये खर्च केले जातील. तालुकानिहाय प्राथमिक केंद्रे अशी: बीड- चौसाळा, पाटोदा- नायगाव, केज- विडा, अंबाजोगाई- घाटनांदूर, परळी- सिरसाळा, गेवराई- तलवाडा, शिरूर- शिरूर, धारूर- भोगलगाव, आष्टी- कडा, वडवणी- कुप्पा, माजलगाव- टाकरवण.