शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘जनशताब्दी’ची बदललेली वेळ गैरसोयीची; नवीन वेळापत्रकामुळे मुंबईत पोहोचेपर्यंत सायंकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 12:28 IST

Janshatabadi Express Changed Time Table : जनशताब्दी एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. परंतु, या रेल्वेची वेळ बदलण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेल्वेची वेळ सकाळी ६ वाजेची करण्याची प्रवासी, व्यापाऱ्यांची मागणीआता मुंबईत मुक्काम करण्याची वेळ येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली. पूर्वी औरंगाबादहून सकाळी ६ वाजता सुटणारी ही रेल्वे आता सकाळी ९.३० वाजता सुटत आहे. ही वेळ औरंगाबादच्या गैरसोयीची ठरत आहे. कारण, मुंबईत पोहोचेपर्यंत सायंकाळ होते आणि मुंबईतील शासकीय आणि खासगी कार्यालये बंद होतात. त्यातून प्रवाशांसह व्यापारी, व्यावसायिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रेल्वेची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी जोर धरत आहे. ( The changed times of ‘Janshatabdi’ express are inconvenient for Aurangabadkars ) 

जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ११ महिने ही रेल्वे ठप्प होती. १४ फेब्रुवारीपासून ही रेल्वे पुन्हा सुरू झाली. जनशताब्दी एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. परंतु, या रेल्वेची वेळ बदलण्यात आली आहे. ही रेल्वे पूर्वी सकाळी ६ वाजता औरंगाबादहून सुटत असे. नव्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे आता सकाळी ९.२० वाजता सुटते. मुंबईत ही रेल्वे सायंकाळी साडेचार वाजता दाखल होते. शिवाय, ही रेल्वे मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मुंबई सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस सुटते. त्यामुळे या वेळापत्रकाविषयी नाराजी व्यक्त करीत पूर्वीप्रमाणेच या रेल्वेची वेळ करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

मुंबईत मुक्कामाची वेळपूर्वी सकाळी ६ वाजता जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादहून सुटत असे आणि दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान मुंबईत पोहोचत असे. त्यामुळे सकाळी मुंबईतील काम आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे. परंतु, आता मुंबईत मुक्काम करण्याची वेळ येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

मुंबईत पोहोचेपर्यंत कार्यालये बंदकामानिमित्त मुंबईला नेहमी ये-जा करावी लागते. जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलली. परंतु, मुंबईतील कार्यालयांची वेळ बदलली नाही. जनशताब्दीने आता मुंबईत पोहोचेपर्यंत कार्यालये बंद होतात. त्यामुळे ही रेल्वे पूर्वीप्रमाणे औरंगाबादहून सकाळी ६ वाजताच धावली पाहिजे.- नंदलाल दरख, प्रवासी

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे