शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

‘जनशताब्दी’ची बदललेली वेळ गैरसोयीची; नवीन वेळापत्रकामुळे मुंबईत पोहोचेपर्यंत सायंकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 12:28 IST

Janshatabadi Express Changed Time Table : जनशताब्दी एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. परंतु, या रेल्वेची वेळ बदलण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेल्वेची वेळ सकाळी ६ वाजेची करण्याची प्रवासी, व्यापाऱ्यांची मागणीआता मुंबईत मुक्काम करण्याची वेळ येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली. पूर्वी औरंगाबादहून सकाळी ६ वाजता सुटणारी ही रेल्वे आता सकाळी ९.३० वाजता सुटत आहे. ही वेळ औरंगाबादच्या गैरसोयीची ठरत आहे. कारण, मुंबईत पोहोचेपर्यंत सायंकाळ होते आणि मुंबईतील शासकीय आणि खासगी कार्यालये बंद होतात. त्यातून प्रवाशांसह व्यापारी, व्यावसायिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रेल्वेची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी जोर धरत आहे. ( The changed times of ‘Janshatabdi’ express are inconvenient for Aurangabadkars ) 

जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ११ महिने ही रेल्वे ठप्प होती. १४ फेब्रुवारीपासून ही रेल्वे पुन्हा सुरू झाली. जनशताब्दी एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. परंतु, या रेल्वेची वेळ बदलण्यात आली आहे. ही रेल्वे पूर्वी सकाळी ६ वाजता औरंगाबादहून सुटत असे. नव्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे आता सकाळी ९.२० वाजता सुटते. मुंबईत ही रेल्वे सायंकाळी साडेचार वाजता दाखल होते. शिवाय, ही रेल्वे मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मुंबई सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस सुटते. त्यामुळे या वेळापत्रकाविषयी नाराजी व्यक्त करीत पूर्वीप्रमाणेच या रेल्वेची वेळ करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

मुंबईत मुक्कामाची वेळपूर्वी सकाळी ६ वाजता जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादहून सुटत असे आणि दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान मुंबईत पोहोचत असे. त्यामुळे सकाळी मुंबईतील काम आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे. परंतु, आता मुंबईत मुक्काम करण्याची वेळ येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

मुंबईत पोहोचेपर्यंत कार्यालये बंदकामानिमित्त मुंबईला नेहमी ये-जा करावी लागते. जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलली. परंतु, मुंबईतील कार्यालयांची वेळ बदलली नाही. जनशताब्दीने आता मुंबईत पोहोचेपर्यंत कार्यालये बंद होतात. त्यामुळे ही रेल्वे पूर्वीप्रमाणे औरंगाबादहून सकाळी ६ वाजताच धावली पाहिजे.- नंदलाल दरख, प्रवासी

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे