शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

चंद्रकांत खैरेंच्या तक्रारीचा तिसरा कोन !

By सुधीर महाजन | Published: May 07, 2019 12:26 PM

दानवे विरोधात काम करतात अशी तक्रार निवडणूक काळातच करता आली असती; पण ती नंतर केली गेली. यामागे तिसरा कोन आहे

- सुधीर महाजन

निवडणुकीचा शिमगा ओसरल्यानंतर कवित्वाला बहर आला आहे साहजिकच आहे ते, कारण निवडणूक ही एक प्रकारचे युद्ध असते. ते रणांगणावर, दिवाणखाण्यात, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसशास्त्रीय या सर्वच पातळ्यांवर लढावे लागते. जसा युद्धाचा एक धर्म असतो तोच निवडणुकीत मित्र पक्षांचाही धर्म असतो मित्र पक्षांकडून घात अपेक्षित नसतो; परंतु औरंगाबादचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मित्रपक्ष म्हणजे भाजप आणि त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म न पाळता घात केला असा थेट आरोप करून खळबळ उडवून दिली. औरंगाबादच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. कारण येथे शिवसेना, एम.आय.एम. आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव अशी तिहेरी लढत झाली. जाधवांच्या उमेदवारीने जशी रंगत वाढली तसा तिढाही, कारण जाधवांच्या मागे मराठा मतदार उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. मराठा आंदोलनानंतर मराठा मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयोग जाधवांच्या उमेदवारीतून झाल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन जाधवांचे महत्त्व एवढेच नाही; तर ते रावसाहेब दानवेंचे जावई आहेत.

या निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला मदत न करता हर्षवर्धन जाधवांना मदत केल्याचा खैरेंचा आरोप आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर दानवेंनी जाधवांना ५० लाखाची आर्थिक रसद पुरवली असा आरोप केला. या निवडणुकीत भाजप प्रचारात नव्हती त्यामुळे आपल्याला मदत मिळाली नाही अशी तक्रार आहे. खैरे यांनी ही तक्रार थेट अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली; पण यांचे स्पष्टीकरण पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंग ठाकुर यांनी केले. वास्तविक ते प्रदेशाध्यक्ष या नात्याने दानवे यांच्याकडून अपेक्षित होते आणि या घटनेपासून दानवेही कुठे दिसत नाहीत.

औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप अशी सत्ताधारी आघाडी असली तरी येथेही युतीधर्माचे पालन होतानां दिसत नाही. शहरात तीव्र पाणी टंचाई आहे, त्यावर उपाय शोधण्याऐवजी भाजप नगरसेवकांनी आंदोलने केली, खरे तर ते सत्ताधारी; पण निवडणुकीपूर्वी शिवसेने विरोधात जनक्षोभ वाढविण्याचे काम भाजपने केले. पालिकेत पावलापावलावर एकमेकांना पद्धतशिरपणे कोलदांडा घालण्याचे काम हे दोन्ही पक्ष करतात. त्यामुळे विरोधीपक्षांना कामच राहिले नाही. निवडणुकीच्या काळात पक्षातील काही नेते मंडळी नागपूर, बीड, मुंबई, पुणे या शहरांमध्ये प्रचारासाठी गेली होती. शिवसेनेचा प्रचार टाळण्याचा हा उत्तम मार्ग त्यांनी शोधून काढला. प्रचार केला नाही असा आरोप करण्यास वाव न देण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.

खैरेंच्या  या तक्रारीला आणखी एक राजकीय पदर असल्याचे जोरदार चर्चा आहे. दानवे विरोधात काम करतात अशी तक्रार निवडणूक काळातच करता आली असती; पण ती नंतर केली. कारण रावसाहब दानवे यांनी आपले स्थान मराठवाड्यात भक्कम करतांना पक्षातील विरोधकांची व्यवस्थित व्यवस्था करून ठेवल्याने आज मराठवाड्याचे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यातून त्यांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे, यामुळे त्यांचे पंख छाटण्यासाठी खैरेंच्या मार्फत भाजपमधूनच ही खेळी खेळली गेली अशी ही चर्चा आहे. खैरेंच्या आरोपांचे उत्तर दानवेंनी दिले असते तर संशयाचे मळभ हटले असते; पण आजपर्यंत ते समोर आले नाही, त्यामुळे संशय वाढला आहे. निकालापूर्वी नव्या साठमारीला सुरूवात झाली. निकालानंतर काय ?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरे