शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

Chandrakant Khaire: "फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजीनगर नामांतरणासाठी मी 100 वेळा भेटलो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 19:47 IST

औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील एका हॉटेलच्या सभागृहात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर उत्तरे आणि माहिती दिली.

औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरुन जाहीर सभेत भूमिका मांडली. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरेंवर टिका केली. संभाजीनगर नामांतराचे आता विसरा, जोपर्यंत भाजपचे सरकार येत नाही, तोपर्यंत संभाजीनगर होत नाही, असेच त्यांनी म्हटले. त्यावरुन, आता चंद्रकांत खैरे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. आपण मुख्यमंत्री असताना मी किमान शंभर वेळा आपणास भेटलो, मग का झालं नाही? असंही ते म्हणाले. 

औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील एका हॉटेलच्या सभागृहात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर उत्तरे आणि माहिती दिली. शहरातील पाणी प्रश्न लवकरच सोडविणार असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम विविध पातळीवरती सुरू आहे. सदरील पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होईल आणि शहराचा 100% पाणीप्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील पाणी प्रश्न बिकट असला तरी महानगरपालिकेने सदरील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या असून त्या माध्यमातून शहरातील अनेक भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे. 

मी फडणवीसांना 100 वेळा भेटलो

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले की देवेंद्र फडवणीस हे मोठे नेते असून त्यांनी बोलताना एकेरी शब्दांचा वापर करू नये. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी मी भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना किमान शंभर वेळा भेटलो, याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, असेही खैरेंनी म्हटले. 

जलील यांना बोलण्याची अक्कल नाही

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना खैरे म्हणाले की, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना बोलण्याची अक्कल नाही, कोणाबद्दल आपण काय बोलतो याचं भान त्यांना राहत नाही. औरंगाबादचा विकास साधण्यात त्यांना अपयश आलं आहे. औरंगाबाद शहरातील सर्व समाजातील नागरिक त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज असून याची जाणीव खासदार इम्तियाज जलील यांना झाली आहे.  

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस