शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खैरेंच्या हातीच होता पालिकेचा रिमोट कंट्रोल;आम्ही सत्तेत सोबत असताना निर्णय घेऊ देत नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 14:58 IST

मनपात शिवसेनेसोबत सत्तेत असताना भाजपने महापौर, उपमहापौर, सभापती पदे भोगलीच आहेत. त्यावेळी त्यांना पाणीपुरवठा प्रश्न आठवला नाही काय, असा टोला शिवसेनेने लगावला.

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे हे वारंवार भाजप आमच्यासोबत सत्तेत होता, अशी दवंडी देत आहेत. आम्ही जरी कालपर्यंत त्यांच्यासोबत सत्तेत होतो, तरीही महापालिकेचा रिमोट कंट्रोल खैरेंच्या हाती होता. पूर्ण सत्तेच्या काळात सभागृह नेता शिवसेनेचाच होता. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकांची आधी खैरे त्यांच्या धोरणानुसार चाळणी करायचे, मग उरलेले विषय सभागृहात मंजूर व्हायचे. या सगळ्यात पाणीपुरवठ्यासह अनेक योजनांची माती शिवसेनेनेच केल्याचा आरोप रविवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला.

२३ मे रोजी सायंकाळी ४ वा. शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून पैठण गेट ते महापालिका असा जल आक्रोश मोर्चा भाजप काढणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपत सध्या आरोप-प्रत्यारोपांचा पलटवार सुरू आहे. मनपात शिवसेनेसोबत सत्तेत असताना भाजपने महापौर, उपमहापौर, सभापती पदे भोगलीच आहेत. त्यावेळी त्यांना पाणीपुरवठा प्रश्न आठवला नाही काय, असा टोला शिवसेनेने लगावला.

त्यावर उत्तर देताना डॉ. कराड यांनी खैरे हेच महापालिका चालवित होते. त्यांच्या सहमतीविना कोणतीही विषय पत्रिका मंजूर हाेत नव्हती. यातूनच समांतर जलवाहिनीचे वाटोळे झाले. नवीन पाणीपुरवठा योजनादेखील हे आणखी दहा वर्षे होऊ देणार नाहीत. भाजप आजवर नागरिकांच्याच बाजूने राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत सत्तेत असतानाही वारंवार पाणीपुरवठ्यावरून पक्ष नगरसेवकांनी आंदोलने केली. १,६८० कोटींच्या योजनेचे काम संथ गतीने होत असल्याने आम्ही शिवसेनेशी युती तोडून मनपा सत्तेतून बाहेर पडल्याचेही कराड म्हणाले. यावेळी आजवर भाजपाने मनपासह शहरात पाणीपुरवठ्यासाठी केलेल्या आंदोलनाचा आढावा घेणारी माजी नगरसेवक नितीन चित्ते यांनी तयारी केलेली पुस्तिका प्रकाशित केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBhagwat Karadडॉ. भागवतChandrachur Singhचंद्रचुर सिंग