शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

‘सनातनी’ जाळे शोधण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:30 IST

सनातनचे कार्यकर्ते शोधण्याचे तपासयंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकामागून एक घटना समोर येत असल्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी, याबाबत एटीएस, सीबीआयला अजून धागेदोरे सापडलेले नाहीत. शहर व जिल्ह्यात एवढे घडत असताना येथील पोलीस यंत्रणेची सतर्कता शून्य असल्याचेदेखील यानिमित्ताने पुढे आले आहे.

ठळक मुद्देपोलिसांची शून्य सतर्कता : औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांत सनातनी कार्यकर्त्यांचे नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सनातनचे कार्यकर्ते शोधण्याचे तपासयंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकामागून एक घटना समोर येत असल्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी, याबाबत एटीएस, सीबीआयला अजून धागेदोरे सापडलेले नाहीत. शहर व जिल्ह्यात एवढे घडत असताना येथील पोलीस यंत्रणेची सतर्कता शून्य असल्याचेदेखील यानिमित्ताने पुढे आले आहे.जानेवारीपासून आजवर औरंगाबाद विविध सामाजिक घटनांमध्ये होरपळले आहे. त्यात पोलिसांनी काय कामगिरी केली, हे औरंगाबादकरांना ज्ञात आहे. शहर व परिसरातील दहशतवादी कारवायांचे नेटवर्क शोधण्याचे आव्हान एटीएस, सीबीआयच्या आधी पोलिसांसमोर आहे.मागील काही दिवसांपासून विविध घटनांमध्ये सनातनच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेल्या धरपकडीमुळे जिल्ह्यात सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. औरंगाबादचे कनेक्शन पुणे, कोल्हापूर, जालना, अशा त्रिकोणात असल्याचे समोर आले असून, सीबीआय आणि एटीएसकडे आणखी काही धागेदारे असण्याची शक्यता आहे.१९९९ साली सनातन संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेचे ध्येय हिंदुत्ववादी असून, शहरातील बहुतांश भागामध्ये या संस्थेचे कार्यकर्ते आहेत. यातील कोण कोणत्या कारवायांमध्ये सहभागी आहे, याचे नेटवर्क शोधून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे.२००० सालापासून २०१८ पर्यंतचा आढावा घेतला, तर शहरातील हिंदू-मुस्लिम दहशतवादी कारवायांची माहिती पुढे येते. त्यात सनातनच्या छुप्या कारवायांची भर पडली असून, नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येशी औरंगाबादचे कनेक्शन तपासात आढळून आल्याने आणखी कुठे-कुठे सनातनी नेटवर्क दडले आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणा कसे पेलणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.