शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

‘सनातनी’ जाळे शोधण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:30 IST

सनातनचे कार्यकर्ते शोधण्याचे तपासयंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकामागून एक घटना समोर येत असल्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी, याबाबत एटीएस, सीबीआयला अजून धागेदोरे सापडलेले नाहीत. शहर व जिल्ह्यात एवढे घडत असताना येथील पोलीस यंत्रणेची सतर्कता शून्य असल्याचेदेखील यानिमित्ताने पुढे आले आहे.

ठळक मुद्देपोलिसांची शून्य सतर्कता : औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांत सनातनी कार्यकर्त्यांचे नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सनातनचे कार्यकर्ते शोधण्याचे तपासयंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकामागून एक घटना समोर येत असल्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी, याबाबत एटीएस, सीबीआयला अजून धागेदोरे सापडलेले नाहीत. शहर व जिल्ह्यात एवढे घडत असताना येथील पोलीस यंत्रणेची सतर्कता शून्य असल्याचेदेखील यानिमित्ताने पुढे आले आहे.जानेवारीपासून आजवर औरंगाबाद विविध सामाजिक घटनांमध्ये होरपळले आहे. त्यात पोलिसांनी काय कामगिरी केली, हे औरंगाबादकरांना ज्ञात आहे. शहर व परिसरातील दहशतवादी कारवायांचे नेटवर्क शोधण्याचे आव्हान एटीएस, सीबीआयच्या आधी पोलिसांसमोर आहे.मागील काही दिवसांपासून विविध घटनांमध्ये सनातनच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेल्या धरपकडीमुळे जिल्ह्यात सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. औरंगाबादचे कनेक्शन पुणे, कोल्हापूर, जालना, अशा त्रिकोणात असल्याचे समोर आले असून, सीबीआय आणि एटीएसकडे आणखी काही धागेदारे असण्याची शक्यता आहे.१९९९ साली सनातन संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेचे ध्येय हिंदुत्ववादी असून, शहरातील बहुतांश भागामध्ये या संस्थेचे कार्यकर्ते आहेत. यातील कोण कोणत्या कारवायांमध्ये सहभागी आहे, याचे नेटवर्क शोधून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे.२००० सालापासून २०१८ पर्यंतचा आढावा घेतला, तर शहरातील हिंदू-मुस्लिम दहशतवादी कारवायांची माहिती पुढे येते. त्यात सनातनच्या छुप्या कारवायांची भर पडली असून, नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येशी औरंगाबादचे कनेक्शन तपासात आढळून आल्याने आणखी कुठे-कुठे सनातनी नेटवर्क दडले आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणा कसे पेलणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.