शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पिके कोमेजली !

By admin | Published: August 19, 2016 12:34 AM

राजेश खराडे , बीड सरासरीएवढे पर्जन्यमान न होताही खरिपातील पिके अद्यापर्यंत जोमात होती. रिमझिम पावसामुळे का होईना पिके बहरात असताना गेल्या दहा दिवसांपासून पावसाची उघडीप

राजेश खराडे , बीडसरासरीएवढे पर्जन्यमान न होताही खरिपातील पिके अद्यापर्यंत जोमात होती. रिमझिम पावसामुळे का होईना पिके बहरात असताना गेल्या दहा दिवसांपासून पावसाची उघडीप व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमिनीतील ओल उडत आहे. परिणामी खरिपातील पिके सुकू लागली आहेत.मराठवाड्यात सर्वांत कमी पाऊस बीड जिल्ह्यात होऊनदेखील सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. पीक लागवडीपासून वेळोवेळी पाऊस झाल्याने दोन महिन्यांतच दोन महिन्यात पिके बहरात आली होती. या उघडिपीच्या काळात शेतकऱ्यांनी मशागत आणि खत फवारणीची कामे करून घेतली. १० दिवसांचा कालावधी होऊन गेला तरीही पावसाचे पुनरागमन झालेले नाही. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी खोल मशागत केली आहे. सध्याचे ऊन आणि वारा यामुळे शेतजमीन कोरडीठाक पडू लागली आहे. हलक्या मशागतीची आवश्यकता असताना शेतकऱ्यांनी खोल मशागत केल्याचा परिणाम सद्य:स्थितीला जाणवू लागला आहे. त्यातच दिवस उजाडताच कडक ऊन पडत असून, दिवसभर उभे वारे सुटत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. अजून आठ दिवस तरी असे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्राने वर्तविला आहे. त्यामुळे पिकांची अवस्था काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पीक वाढीकरिता पावसाची उघडीप फलदायी असली तरी सद्य:स्थितीला पावसाची नितांत गरज आहे. यातच शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दिल्यास ओल उडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.