शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथक गंगापूरमध्ये पाहणार जिल्ह्याचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:47 IST

मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौºयावर येत असून, तीनऐवजी आता दोनच पथके दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. पहिले पथक गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी डॅम, मुरमी आणि सुलतानपूर येथे पथक भेट देईल, तसेच शेतकरी व नागरिकांशी पथकातील अधिकारी संवाद साधून जळगावकडे रवाना होतील, तर दुसरे पथक जालना, बुलडाणा आणि बीड, परभणीचा दौरा करील.

ठळक मुद्देकेंद्रीय पथक गंगापूरमध्ये पाहणार जिल्ह्याचा दुष्काळ

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाहणी : दोनच पथके मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणारऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौºयावर येत असून, तीनऐवजी आता दोनच पथके दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. पहिले पथक गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी डॅम, मुरमी आणि सुलतानपूर येथे पथक भेट देईल, तसेच शेतकरी व नागरिकांशी पथकातील अधिकारी संवाद साधून जळगावकडे रवाना होतील, तर दुसरे पथक जालना, बुलडाणा आणि बीड, परभणीचा दौरा करील.इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाºया पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा या पथकाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या उपस्थितीत पथक क्र.१ विभागीय आयुक्तालयातून सकाळी १०.३० वा. गंगापूर तालुक्याकडे प्रस्थान करील. त्यांच्यासमवेत कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए.के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर.डी. देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी असतील. दुपारी साडेबारानंतर जळगाव जिल्ह्याच्या दिशेने पथक प्रस्थान करील. तत्पूर्वी विभागीय आयुक्तांच्या दालनात सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत दोन्ही पथकांतील अधिकाºयांसोबत आढावा बैठक होईल.दुसरे पथक सकाळी १०.३० वा. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याकडे प्रस्थान करील. जवसगाव, बेतलम येथे स्थळपाहणी करून पथक २ वा. बुलडाण्याच्या दिशेने जाईल. ६ रोजी दुसरे पथक परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गणेशपूर येथे पाहणी करील. त्यानंतर पेडगाव, रूडी येथे पाहणी करून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रेवली येथे स्थळपाहणी करून शेतकºयांशी संवाद साधेल. तेथून माजलगाव, खडकी, वडवणी भागात पथक जाईल. त्यानंतर जरूड, कांबी येथे पाहणी करील. त्यानंतर पथक ६ रोजी रात्री औरंगाबादला मुक्कामी येईल. दोन्ही पथके ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल देतील. त्या अहवालानंतर केंद्र आणि राज्य शासन शेतकºयांसाठी मदतीबाबत निर्णय घेईल.पश्चिम महाराष्ट्राचा दौरा वगळलाऔरंगाबाद, जालना, बीड, परभणी, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, बुलडाणा जिल्ह्यांसाठी पहिला दौरा होता. त्यासाठी तीन पथके होती; परंतु मंगळवारी दिवसभर केंद्र, राज्य आणि विभाग पातळीवर नियोजनावर मोठा खल झाला. शेवटी दोनच पथके औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यात जाणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारdroughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद