शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

केंद्रीय पथक गंगापूरमध्ये पाहणार जिल्ह्याचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:47 IST

मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौºयावर येत असून, तीनऐवजी आता दोनच पथके दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. पहिले पथक गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी डॅम, मुरमी आणि सुलतानपूर येथे पथक भेट देईल, तसेच शेतकरी व नागरिकांशी पथकातील अधिकारी संवाद साधून जळगावकडे रवाना होतील, तर दुसरे पथक जालना, बुलडाणा आणि बीड, परभणीचा दौरा करील.

ठळक मुद्देकेंद्रीय पथक गंगापूरमध्ये पाहणार जिल्ह्याचा दुष्काळ

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाहणी : दोनच पथके मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणारऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौºयावर येत असून, तीनऐवजी आता दोनच पथके दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. पहिले पथक गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी डॅम, मुरमी आणि सुलतानपूर येथे पथक भेट देईल, तसेच शेतकरी व नागरिकांशी पथकातील अधिकारी संवाद साधून जळगावकडे रवाना होतील, तर दुसरे पथक जालना, बुलडाणा आणि बीड, परभणीचा दौरा करील.इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाºया पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा या पथकाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या उपस्थितीत पथक क्र.१ विभागीय आयुक्तालयातून सकाळी १०.३० वा. गंगापूर तालुक्याकडे प्रस्थान करील. त्यांच्यासमवेत कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए.के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर.डी. देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी असतील. दुपारी साडेबारानंतर जळगाव जिल्ह्याच्या दिशेने पथक प्रस्थान करील. तत्पूर्वी विभागीय आयुक्तांच्या दालनात सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत दोन्ही पथकांतील अधिकाºयांसोबत आढावा बैठक होईल.दुसरे पथक सकाळी १०.३० वा. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याकडे प्रस्थान करील. जवसगाव, बेतलम येथे स्थळपाहणी करून पथक २ वा. बुलडाण्याच्या दिशेने जाईल. ६ रोजी दुसरे पथक परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गणेशपूर येथे पाहणी करील. त्यानंतर पेडगाव, रूडी येथे पाहणी करून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रेवली येथे स्थळपाहणी करून शेतकºयांशी संवाद साधेल. तेथून माजलगाव, खडकी, वडवणी भागात पथक जाईल. त्यानंतर जरूड, कांबी येथे पाहणी करील. त्यानंतर पथक ६ रोजी रात्री औरंगाबादला मुक्कामी येईल. दोन्ही पथके ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल देतील. त्या अहवालानंतर केंद्र आणि राज्य शासन शेतकºयांसाठी मदतीबाबत निर्णय घेईल.पश्चिम महाराष्ट्राचा दौरा वगळलाऔरंगाबाद, जालना, बीड, परभणी, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, बुलडाणा जिल्ह्यांसाठी पहिला दौरा होता. त्यासाठी तीन पथके होती; परंतु मंगळवारी दिवसभर केंद्र, राज्य आणि विभाग पातळीवर नियोजनावर मोठा खल झाला. शेवटी दोनच पथके औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यात जाणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारdroughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद