शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 2:17 PM

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ ऑगस्ट १९२० सुरुवात

ठळक मुद्देबलवंत वाचनालयाच्या शताब्दी वर्षास सुरुवातऔरंगाबाद शहरातील पहिले वाचनालय  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ आॅगस्ट १९२० ला स्थापना

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : निजामी राजवटीमुळे शहराची मराठी संस्कृती ढासळतेय की काय, अशी परिस्थिती जवळपास १०० वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. त्यामुळे निजामशाहीतही मराठी वाचन संस्कृती टिकून राहावी, मराठी वाचनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासह भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औरंगाबाद शहरात १ आॅगस्ट १९२० रोजी ‘बलवंत’ वाचनालय सुरू झाले. यंदा हे वाचनालय शताब्दी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. 

संस्थेचे विद्यमान कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर आणि ग्रंथपाल आशा कोरान्ने यांनी सांगितले की, लक्ष्मणराव नेवासेकर, आनंदकृष्ण वाघमारे, वि. गो. कर्वे, गणपतराव वैद्य, विजयेंद्र काबरा, कृ. वि. भगूरकर, ज. प. मुळे, हनुमंतराव वैष्णव, के. टी. राजन, पु. बा. जोशी, प्र. का. भालेराव, द. र. वैद्य, रमणलाल बाकलीवाल, जुल्फेकार हुसैन या मंडळींच्या संकल्पनेनुसार त्या काळी औरंगाबाद शहरातील या पहिल्या-वहिल्या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या मंडळींसोबत अनेक ज्ञात, अज्ञात लोकांचे सहकार्य या वाचन चळवळीला हातभार लावणारे होते. 

सुरुवातीला शहरवासीयांसाठी वाचनालय हा कौतुकाचा विषय असला तरी ही गोष्ट अगदीच नावीन्यपूर्ण होती. त्यामुळे वाचकांना ग्रंथालयापर्यंत आणण्यासाठीही त्या काळात नवनवीन उपक्रम घेण्यात यायचे. साहित्यिकांच्या भेटी, पुस्तक प्रकाशन झाल्यावर पुस्तकावर आधारित कार्यक्रम, वाचन कार्यशाळा अशा कार्यक्रमांतून मग वाचक वर्ग जोडला जाऊ लागला आणि ग्रंथालयाचा विस्तार वाढत गेला. 

सध्या ज्या ठिकाणी हे वाचनालय आहे, त्याच ठिकाणी त्या काळात अगदी लहानशा जागेत वाचनालयाची सुरुवात झाली. वाचनालय नवीन असले तरी त्या काळीही ते साहित्य संपदेने अगदी संपन्न होते. ६००० पुस्तकांच्या सोबतीने तेव्हा ग्रंथालयाचा प्रवास सुरू झाला होता, तो आता ७२ हजार १३० पुस्तकांवर येऊन ठेपला आहे आणि आजही दिवसागणिक वाचनालय अधिकच साहित्यसंपन्न होण्याकडे वाटचाल करीत आहे. त्या काळातही प्रामुख्याने बालकांना वाचन चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे सुरुवातीला ५० बालवाङ्मये वाचनालयात होती. आज ही संख्या ८,७५६ झाली आहे. आज बलवंत वाचनालयातील वाचकसंख्या १० हजारांपेक्षाही अधिक असून, त्यापैकी ३ हजार नियमित वाचक आहेत. 

वसंतराव नाईक, रफिक झकेरिया, ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख, शिवाजी सावंत, ल. श. कुलकर्णी, वा. मा. जोशी यासारख्या अनेक दिग्गजांनी बलवंत वाचनालयाला भेट दिली आहे. विद्यमान अध्यक्ष बिपीनकुमार बाकलीवाल, कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, चिटणीस एस. एम. बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार वाचन संस्कृतीतील बदल स्वीकारून ग्रंथालयाची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे.

काळानुसार वाचन संस्कृती बदलत जात आहे. त्यामुळे बलवंत वाचनालयानेही हे बदल स्वीकारून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. या अंतर्गत शाळांमध्ये, कारागृहात मोफत पुस्तके देत आहोत. तसेच ‘पेरीफेरल लायब्ररी’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बेरोजगार, वृद्ध मंडळींनी बलवंत वाचनालयातून मोफत पुस्तके घ्यायची, स्वतंत्र ग्रंथालय सुरू करून ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवायची आणि ठराविक कालावधीने ती बदलून घ्यायची, अशी संकल्पना आहे. 

- डॉ. सुभाष झंवर

टॅग्स :marathiमराठीMarathwadaमराठवाडाlibraryवाचनालयAurangabadऔरंगाबाद