शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

औरंगाबादेत गल्लीबोळात होणार सिमेंट रस्त्यांची कामे; मनपा करणार २५३ पैकी १८० रस्ते गुळगुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 6:49 PM

महापालिकेत सध्या सिमेंट संस्कृतीचे वारे जोरात वाहत आहे. महापालिकेने मागील आठवड्यात विविध कामांच्या तब्बल २५३ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत

औरंगाबाद : महापालिकेत सध्या सिमेंट संस्कृतीचे वारे जोरात वाहत आहे. महापालिकेने मागील आठवड्यात विविध कामांच्या तब्बल २५३ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील तब्बल १८० कामे सिमेंट रस्त्यांची आहेत. ही सर्व कामे प्रत्येक नगरसेवकाने सुचविलेली असल्यामुळे गल्लीबोळातही आता सिमेंट रस्ते करण्यावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होण्यासाठी जमीनच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती मनपाकडूनच निर्माण करण्यात येत आहे.

यंदा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. यामध्ये किमान ६०० कोटी रुपयांची कामे सिमेंट रस्त्यांची आहेत. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डात सिमेंट रस्ते करण्यासाठी किमान ४ ते ५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. मतदारांना खुश करण्यासाठी सिमेंट रस्ते हा एकमेव पर्याय नगरसेवकांनी निवडला आहे. सिमेंट रस्ते म्हणजेच विकास, असा समज मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा झाला आहे.

शहरातील ११५ वॉर्डांमध्ये आजही ७० ते ८० ठिकाणी ड्रेनेजचे दूषित पाणी वाहत आहे. ड्रेनेज लाईन बदलण्याची तसदी नगरसेवक घेण्यास तयार नाहीत. २५ ते ३० वसाहतींमध्ये मागील सहा महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. जलवाहिन्या बदलण्याकडे नगरसेवकांचा अजिबात कल नाही. शहरातील लाखो नागरिक ज्या डी.पी. रस्त्यांचा सर्वाधिक वापर करतात त्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही.शहरात महापालिकेच्या ताब्यात ११०० किलोमीटरचे प्रमुख रस्ते आहेत. यामध्ये सर्व मोठ्या रस्त्यांचा समावेश आहे. वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची लांबी जवळपास ३ हजार किलोमीटर आहे.

मागील दोन वर्षांपासून नगरसेवक वॉर्डातील छोटे-छोटे रस्तेही सिमेंटचे तयार करीत आहेत. रस्ते गुळगुळीत होणे ही चांगली बाब असली तरी त्याचे नेमके प्रमाण किती असावे याचा विचारच प्रशासन करायला तयार नाही. अधिकारी नगरसेवकांना खुश करण्यासाठी तर नगरसेवक मतदारांना खुश करण्यासाठी धडाधड सिमेंट रस्ते तयार करण्यावर भर देत आहेत. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा व्हावा एवढीही जागा शिल्लक ठेवायला नगरसेवक तयार नाहीत.

झटपट काम म्हणून...महापालिकेतील बहुतांश कंत्राटदारांनीही आता सिमेंट रस्त्यांच्या कामांकडे मोर्चा वळविला आहे. गल्लीबोळातील सिमेंटच्या रस्त्याचे काम आठ दिवसांत संपते. शहरातील सिमेंट मिक्सर प्लँटमधून रेडिमेड साहित्य आणून एका दिवसात काम संपविता येते. तयार रस्त्यावर फक्त आठ दिवस पाणी पाजल्यावर काम फत्ते होते. दहाव्या दिवशी कंत्राटदार बिल घेऊन मनपाच्या लेखा विभागात हजर असतो.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा