शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

औरंगाबाद शहराच्या सीमेवर सतरा ठिकाणी लागणार सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:08 IST

लोकसहभागातून हे कॅमेरे बसविण्यात येत आहे.

औरंगाबाद : शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या सीमेवरील सतरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. लोकसहभागातून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे कॅमेरे बसविले जात आहेत.

एक सीसीटीव्ही कॅमेरा चार पोलीस कर्मचाऱ्यांचे काम करू शकतो, असे म्हटले जाते. यामुळे काही वर्षांपासून पोलीस यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आग्रह असतो. गत महिन्यात शहरात मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना घडल्या. शिवाय पैशाच्या बॅगा पळविण्याचेही प्रकार घडले. 

शहरात सेफ सिटी प्रकल्पांतर्गत ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे खून, वाटमारीसह अनेक गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना शक्य झाले होते. मात्र, शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्हेगार सीसीटीव्ही नसलेल्या रस्त्याचा वापर करतात. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्याने शहराच्या बॉर्डवरील १७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेचीच मदत घेतली. लोकसहभागातून हे कॅमेरे बसविण्यात येत आहे.

जालना रस्त्यावरील केम्ब्रिज चौक, देवळाई चौक, पैठण रोड, नगरनाका, दौलताबाद टी पॉइंट, जटवाडा रोड, हर्सूल टी पॉइंट, पिसादेवी रस्ता, पळशी रस्ता, मांडकी रोड, सातारा गाव रस्ता आदी ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासोबतच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात साडेसातशे आणि दुसऱ्या टप्प्यात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर सुरक्षित शहर म्हणून औरंगाबादची ओळख होणार आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी