शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

औरंगाबाद शहराच्या सीमेवर सतरा ठिकाणी लागणार सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:08 IST

लोकसहभागातून हे कॅमेरे बसविण्यात येत आहे.

औरंगाबाद : शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या सीमेवरील सतरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. लोकसहभागातून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे कॅमेरे बसविले जात आहेत.

एक सीसीटीव्ही कॅमेरा चार पोलीस कर्मचाऱ्यांचे काम करू शकतो, असे म्हटले जाते. यामुळे काही वर्षांपासून पोलीस यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आग्रह असतो. गत महिन्यात शहरात मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना घडल्या. शिवाय पैशाच्या बॅगा पळविण्याचेही प्रकार घडले. 

शहरात सेफ सिटी प्रकल्पांतर्गत ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे खून, वाटमारीसह अनेक गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना शक्य झाले होते. मात्र, शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्हेगार सीसीटीव्ही नसलेल्या रस्त्याचा वापर करतात. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्याने शहराच्या बॉर्डवरील १७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेचीच मदत घेतली. लोकसहभागातून हे कॅमेरे बसविण्यात येत आहे.

जालना रस्त्यावरील केम्ब्रिज चौक, देवळाई चौक, पैठण रोड, नगरनाका, दौलताबाद टी पॉइंट, जटवाडा रोड, हर्सूल टी पॉइंट, पिसादेवी रस्ता, पळशी रस्ता, मांडकी रोड, सातारा गाव रस्ता आदी ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासोबतच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात साडेसातशे आणि दुसऱ्या टप्प्यात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर सुरक्षित शहर म्हणून औरंगाबादची ओळख होणार आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी