शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शहरात १२ वस्त्यांवर जातींचे लेबल

By | Updated: December 4, 2020 04:10 IST

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी एवढीच आता औरंगाबादची ओळख राहिलेली नाही, तर येथे बहुभाषिक, बहुधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. शहरात ...

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी एवढीच आता औरंगाबादची ओळख राहिलेली नाही, तर येथे बहुभाषिक, बहुधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. शहरात १२ वस्त्यांंना जातींचे लेबल आहेत; परंतु राज्य सरकारच्या निर्णयानुसार हे लेबल लवकरच पुसले जाईल.

सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यात वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची देण्याची प्रथा बंद केली. वस्त्यांना जातींऐवजी महापुरुषांची अथवा समतानगर, भीमनगर, ज्योतीनगर, क्रांतीनर या प्रकारची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. वस्त्यांची नावे जातीवाचक असल्याने समाजात वेगळेपणाची भावना निर्माण होते. त्याचा परिणाम सामाजिक सलोख्यावर होतो. हे टाळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबादेत औद्योगिक प्रगती साधतानाच शैक्षणिक संस्था, मॉल्स मल्टिप्लेक्सेस, हॉटेल्स, हॉस्पिटल आणि नवनवीन उद्योगसमूह शहरात सुरू होत आहेत. स्थानिक नागरिकांसोबतच परराज्यातील लोकही येथे काम करतात. शहरात जुन्या भागांसह गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या काही वसाहती, गल्ल्यांना आजही जातिवाचक नावे आहेत; परंतु सामाजिक सलोख्यात त्याचा आजवर कोणताही अडथळा आलेला नाही. प्रपंच करतानाच सामाजिक बांधिलकीही औरंगाबादकर जोपासत आहेत. सण,उत्सव असो की, एखादी सामाजिक परिस्थिती, अशावेळी प्रत्येक जाती, धर्माचे लोक एकत्र उभे राहिले आहेत. वसाहतींवरील जातीचे लेबल हटल्यानंतर सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन आणखी एकात्मता वाढण्यास मदत होईल.

शहरातील या आहेत वस्त्या

बंजारा कॉलनी, बौद्धनगर, ख्रिस्तनगर, सिंधी कॉलनी, बुऱ्हाणी कॉलनी, गवळीपुरा, भोईवाडा, कुंभारवाडा, कासारी बाजार, ब्राम्हण गल्ली, ढिवर गल्ली, बुरुड गल्ली.