शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखल; १६ पोलीस कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:40 IST

 दोन गटात किरकोळ वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात झाले

छत्रपती संभाजीनगर: शहरातील किराडपुरा परिसरात बुधवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी 400 ते 500 अज्ञात व्यक्तींवर शहरातील जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुधवारी मध्यरात्री दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या वादाचे रुपांतर काही वेळात तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात झाली. बघताबघता किराडपुरा भागात तणाव निर्माण झाला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करत अश्रूधुराचे नळकांडे फोडत जमाव पांगवला. यावेळी पोलिसांना हवेत गोळीबार देखील करावा लागला. पहाटे चार वाजता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, जमावाने सरकारी 7 आणि खाजगी 6 अशा एकूण 13 गाड्या जाळल्या. यात 16 पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत. आज दुपारी या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात  400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली गुन्हा दाखल 307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किराडपुरा भागात तणावपूर्ण शांतता किराडपुरा भागात श्रीराम मंदिर आहे. आज राम नवमी असल्याने या मंदिरात भाविकांसह अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. रमजान महिना आणि राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच शांततेचे आवाहन केले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद