शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

करिअर सोपं, लग्न जमणं अवघड; गावातले सोडा शहरातील मुलांना देखील मुली मिळेनात

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 14, 2022 18:03 IST

लग्नाचे वय चालले निघून; समाज कोणताही असो, पण शिक्षणामुळे तरुणींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

औरंगाबाद : ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातील तरुणांचे लग्नाचे वयसुद्धा निघून चालले आहे. वयाची चाळिशी ओलांडली, तरी लग्न होत नसल्याने आता लोक त्यांना घोडनवरदेव असे चिडवत आहेत. मात्र, अशामुळे या विवाहेच्छुकांच्या मनात न्यूनंगड निर्माण होत आहे. त्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यासही समाजाला वेळ नाही. कारण, तरुणींना मुंबई-पुणे, बंगळुरू अशा शहरांत स्थायिक असलेला गलेलठ्ठ पगार असणारा जोडीदार हवा आहे. एवढेच नव्हे तर त्याच्याकडे शेतीसुद्धा असली पाहिजे, या अटीमध्ये न बसणाऱ्या तरुणांना जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे अनुरूप, आपल्या अपेक्षांना पात्र जोडीदार मिळत नसल्याने तरुणींचे लग्नाचे वय वाढत असून, अशा असंख्य तरुणीही ‘स्वप्नातील राजकुमारा’ची प्रतीक्षा करत आहेत.

स्वप्नातील राजकुमाराबदल तरुणींच्या अपेक्षा १) आयटी कंपनीतील, लाखोंचे पॅकेज पाहिजे. २) पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद अशा शहरांतीलच असावा. ३) शासकीय नोकरी असल्यासही उत्तम. ४) जोडीदार शेतकरी नको, पण त्याच्याकडे शेती असावी. ५) घर स्वत:चे असावे, चारचाकी गाडी असावी. ६) आईवडील, नणंद यांना सोडून बाहेरगावी नोकरी करणारा असावा. ७) मुलगा दिसायला अनुरूप व निर्व्यसनी असावा. ८) आठवड्यातून एकदा तरी हॉटेलमध्ये घेऊन जाणारा असावा.

सर्वच समाजात मुली मिळणे कठीणसमाज कोणताही असो, पण शिक्षणामुळे तरुणींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक तरुणी नोकरी करून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. बहुतांश तरुणी उच्चशिक्षण घेत आहेत. यामुळे त्यांच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. बंधनमुक्त वातावरणात त्यांना संसार करायचा आहे.

शेतकरी मुलांची अवस्था अधिक वाईटशेतकरी मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलाकडे शेती असावी, पण त्याला नोकरीही असली पाहिजे. या तरुणींच्या अपेक्षामुळे शेतकरी तरुणांचे वय वाढत आहे. तरुणांमध्ये निराशा निर्माण होत आहे.

वयाची चाळिशी ओलांडली, तरी लग्नाच्या प्रतीक्षेतआमच्याकडे विवाहेच्छुकांची नावे येत असतात. यात ४० टक्के तरुणांनी वयाची चाळिशी पार केली आहे. अशाही काही तरुणी आहेत, त्यांच्या अपेक्षानुसार नवरा मिळत नसल्याने त्यांनी वयाची तिशी ओलांडली आहे.- सुधीर नाईक, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नि:शुल्क वधू-वर केंद्र

माझ्यापेक्षा जास्त पगार असलेला मुलगा पाहिजेआजघडीला आमच्याकडे ४० हजारांपेक्षा जास्त विवाह इच्छुक तरुण-तरुणींचा ‘बायोडेटा’ आहे. मुलांप्रमाणे मुलीही उच्चशिक्षित आहेत. ‘आयटी’त मुलीला २० लाखांपर्यंत पॅकेज असले, तर तिची अपेक्षा २५ ते ४० लाखांचे पॅकेज असणारा जोडीदार मिळावा, अशी आहे. यामुळे कमी शिक्षण असलेल्यांचे सोडा, पण उच्च शिक्षितांचेही लग्न लांबत आहेत.- सुनील वायकोस, सकल जैन वधू-वर परिचय मेळावा.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबाद