शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

कुत्रा चावलाय, रेबीजचं इंजेक्शन घेतलं तर रक्तदान करता येते का?

By संतोष हिरेमठ | Updated: July 30, 2024 20:24 IST

रक्तदानाने गरजू रुग्णांना जीवदान : शारीरिक अन् मानसिक आरोग्य फिट असेल तर रक्तदान

छत्रपती संभाजीनगर : रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते. एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान जीवनदान ठरते. त्यामुळे अनेकजण नियमितपणे रक्तदान करतात. मात्र, अनेक कारणांनी इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही. कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लस घ्यावी लागते. ही लस घेतल्यानंतर वर्षभर रक्तदान करता येत नाही.

रक्तदान करताना आरोग्य उत्तम असणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदान करण्यापूर्वी दात्यांची आवश्यक ती तपासणी केली जात आहे. दात्याविषयी आवश्यक ती माहिती घेतल्यानंतरच रक्त केंद्रातील अधिकारी-कर्मचारी दात्याचे रक्तदान करून घेतात.

रक्तदान करताना उत्तम आरोग्य महत्त्वाचेरक्तदान करताना दात्याचे आरोग्य उत्तम हवे. शारीरिक आरोग्याबरोबर दात्याचे मानसिक आरोग्यही चांगले हवे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

१८ ते ६५ वर्षे स्वेच्छेने करू शकाल रक्तदानवयाची १८ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते. मात्र, वयाच्या ६० व्या वर्षी पहिल्यांदा रक्तदान करता येत नाही. नियमितपणे रक्तदान करणाऱ्यास ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते.

एचबी किमान १२.५; वजन हवे ४५ किलोंच्या पुढेरक्तदानासाठी एचबी किमान १२.५ हवे, तर वजन किमान ४५ किलो हवे. ४५ किलो वजनाच्या व्यक्तीला ३५० मिली आणि ५५ किलो वजनाच्या व्यक्तीला ४५० मिली रक्तदान करता येते.

गर्भवतींना रक्तदान करता येते का ?गर्भवतींना रक्तदान करता येत नाही. प्रसूतीनंतरही वर्षभर रक्तदान करता येत नाही. त्याबरोबरच बाळाला स्तनपान सुरू असेल, तरीही रक्तदान करता येत नाही. गर्भपातानंतर किमान सहा महिने रक्तदान करता येत नाही.

दर तीन महिन्यांनी करता येईल रक्तदानपुरुषांना ९० दिवसांनी म्हणजे दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते, तर महिलांना दर १२० दिवसांनंतर म्हणजे चार महिन्यांनंतर रक्तदान करता येते.

रक्तदान करण्यापूर्वी हे लक्षात असू द्या- तीन दिवस अगोदर प्रतिजैविके घेतलेली नकोत- गत तीन महिन्यांत मलेरिया झालेला नको- वर्षभरात कावीळ, विषमज्वर झालेला नको- रिक्रिएशनल, अंमली पदार्थांचे सेवन नको- गत वर्षभरात श्वानदंश झालेला नको- गत वर्षभरात रेबीजची लस घेतलेली नको- रक्तदान करण्याआधी १५ दिवस आधी, कॉलरा, टायफाइड, प्लेगची लस घेतलेली असायला नको

या व्यक्तींना करता नाही येत रक्तदानबंदीवान, हृदयाचे आजार, कॅन्सर रुग्ण, ट्रान्सजेंडर, इन्सलिन घेत असेल तर, थाॅयराॅइड रुग्ण ( यू थाॅराईड वगळून), हिपॅटिटीस बी, हिपॅटिसीस सी रुग्ण यांना रक्तदान करता येत नाही.

गरजू रुग्णांसाठी रक्तदान कराशारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असणारी व्यक्ती रक्तदान करू शकते. गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी जास्तीत जास्त दात्यांनी घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्तदान करावे.- डाॅ. भारत सोनवणे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीAurangabadऔरंगाबाद