शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा चावलाय, रेबीजचं इंजेक्शन घेतलं तर रक्तदान करता येते का?

By संतोष हिरेमठ | Updated: July 30, 2024 20:24 IST

रक्तदानाने गरजू रुग्णांना जीवदान : शारीरिक अन् मानसिक आरोग्य फिट असेल तर रक्तदान

छत्रपती संभाजीनगर : रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते. एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान जीवनदान ठरते. त्यामुळे अनेकजण नियमितपणे रक्तदान करतात. मात्र, अनेक कारणांनी इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही. कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लस घ्यावी लागते. ही लस घेतल्यानंतर वर्षभर रक्तदान करता येत नाही.

रक्तदान करताना आरोग्य उत्तम असणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदान करण्यापूर्वी दात्यांची आवश्यक ती तपासणी केली जात आहे. दात्याविषयी आवश्यक ती माहिती घेतल्यानंतरच रक्त केंद्रातील अधिकारी-कर्मचारी दात्याचे रक्तदान करून घेतात.

रक्तदान करताना उत्तम आरोग्य महत्त्वाचेरक्तदान करताना दात्याचे आरोग्य उत्तम हवे. शारीरिक आरोग्याबरोबर दात्याचे मानसिक आरोग्यही चांगले हवे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

१८ ते ६५ वर्षे स्वेच्छेने करू शकाल रक्तदानवयाची १८ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते. मात्र, वयाच्या ६० व्या वर्षी पहिल्यांदा रक्तदान करता येत नाही. नियमितपणे रक्तदान करणाऱ्यास ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते.

एचबी किमान १२.५; वजन हवे ४५ किलोंच्या पुढेरक्तदानासाठी एचबी किमान १२.५ हवे, तर वजन किमान ४५ किलो हवे. ४५ किलो वजनाच्या व्यक्तीला ३५० मिली आणि ५५ किलो वजनाच्या व्यक्तीला ४५० मिली रक्तदान करता येते.

गर्भवतींना रक्तदान करता येते का ?गर्भवतींना रक्तदान करता येत नाही. प्रसूतीनंतरही वर्षभर रक्तदान करता येत नाही. त्याबरोबरच बाळाला स्तनपान सुरू असेल, तरीही रक्तदान करता येत नाही. गर्भपातानंतर किमान सहा महिने रक्तदान करता येत नाही.

दर तीन महिन्यांनी करता येईल रक्तदानपुरुषांना ९० दिवसांनी म्हणजे दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते, तर महिलांना दर १२० दिवसांनंतर म्हणजे चार महिन्यांनंतर रक्तदान करता येते.

रक्तदान करण्यापूर्वी हे लक्षात असू द्या- तीन दिवस अगोदर प्रतिजैविके घेतलेली नकोत- गत तीन महिन्यांत मलेरिया झालेला नको- वर्षभरात कावीळ, विषमज्वर झालेला नको- रिक्रिएशनल, अंमली पदार्थांचे सेवन नको- गत वर्षभरात श्वानदंश झालेला नको- गत वर्षभरात रेबीजची लस घेतलेली नको- रक्तदान करण्याआधी १५ दिवस आधी, कॉलरा, टायफाइड, प्लेगची लस घेतलेली असायला नको

या व्यक्तींना करता नाही येत रक्तदानबंदीवान, हृदयाचे आजार, कॅन्सर रुग्ण, ट्रान्सजेंडर, इन्सलिन घेत असेल तर, थाॅयराॅइड रुग्ण ( यू थाॅराईड वगळून), हिपॅटिटीस बी, हिपॅटिसीस सी रुग्ण यांना रक्तदान करता येत नाही.

गरजू रुग्णांसाठी रक्तदान कराशारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असणारी व्यक्ती रक्तदान करू शकते. गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी जास्तीत जास्त दात्यांनी घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्तदान करावे.- डाॅ. भारत सोनवणे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीAurangabadऔरंगाबाद