शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

औरंगाबाद जिल्ह्यात महावितरणची कृषिपंपांविरुद्ध धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:47 IST

महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. हातातोंडाला आलेली पिके  माना टाकू लागली आहेत. त्यामुळे मिळेल तेवढे पाणी पिकांना देण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. परिणामी, रोहित्र जळण्याची संख्या वाढली असून, दुरुस्तीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. 

यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर रोजी महावितरणच्या संचालकांनी (संचलन) राज्यातील सर्व परिमंडळांना कृषिपंपांचे अनधिकृत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून या मोहिमेने वेग घेतला आहे. सध्या शेतीला पाणी देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा तब्बल २० ते २५ टक्के जास्तीची विजेची मागणी वाढली असून रोहित्र जळण्याची संख्याही वाढली आहे. एकेका शेतामध्ये दोन-दोन विद्युत मोटारी सुरू असल्याचेही गणेशकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

रोहित्र दुरुस्तीसाठी परिसरातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी ज्यांचे २५ हजार रुपयांपर्यंत वीज बिल थकले असेल, त्यांनी किमान ३ हजार रुपयांची थकबाकी भरावी, तर ज्यांचे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल थकले आहे, त्या शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये थकबाकी भरल्यास रोहित्र दुरुस्त करून देण्याची अट महावितरणने घातली आहे. दिवसेंदिवस कृषिपंपांच्या थकबाकीमध्ये मोठी वाढ होत चालली आहे. कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे. 

कृषिपंपांकडे १ हजार ७०२ कोटी १६ लाख रुपये थकबाकीजिल्ह्यात एकूण २ लाख १६ हजार ५९३ कृषिपंप ग्राहकांकडे १ हजार ७०२ कोटी १६ लाख रुपये एवढी थकबाकी असून, यापैकी २५ हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेले १ लाख ८५ हजार ४४५ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १ हजार ६६० कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे, तर २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेले ३१ हजार १४८ ग्राहक असून त्यांच्याकडे ४१ कोटी ५७ लाख रुपये थकबाकी आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद