शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात महावितरणची कृषिपंपांविरुद्ध धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:47 IST

महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. हातातोंडाला आलेली पिके  माना टाकू लागली आहेत. त्यामुळे मिळेल तेवढे पाणी पिकांना देण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. परिणामी, रोहित्र जळण्याची संख्या वाढली असून, दुरुस्तीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. 

यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर रोजी महावितरणच्या संचालकांनी (संचलन) राज्यातील सर्व परिमंडळांना कृषिपंपांचे अनधिकृत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून या मोहिमेने वेग घेतला आहे. सध्या शेतीला पाणी देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा तब्बल २० ते २५ टक्के जास्तीची विजेची मागणी वाढली असून रोहित्र जळण्याची संख्याही वाढली आहे. एकेका शेतामध्ये दोन-दोन विद्युत मोटारी सुरू असल्याचेही गणेशकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

रोहित्र दुरुस्तीसाठी परिसरातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी ज्यांचे २५ हजार रुपयांपर्यंत वीज बिल थकले असेल, त्यांनी किमान ३ हजार रुपयांची थकबाकी भरावी, तर ज्यांचे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल थकले आहे, त्या शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये थकबाकी भरल्यास रोहित्र दुरुस्त करून देण्याची अट महावितरणने घातली आहे. दिवसेंदिवस कृषिपंपांच्या थकबाकीमध्ये मोठी वाढ होत चालली आहे. कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे. 

कृषिपंपांकडे १ हजार ७०२ कोटी १६ लाख रुपये थकबाकीजिल्ह्यात एकूण २ लाख १६ हजार ५९३ कृषिपंप ग्राहकांकडे १ हजार ७०२ कोटी १६ लाख रुपये एवढी थकबाकी असून, यापैकी २५ हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेले १ लाख ८५ हजार ४४५ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १ हजार ६६० कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे, तर २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेले ३१ हजार १४८ ग्राहक असून त्यांच्याकडे ४१ कोटी ५७ लाख रुपये थकबाकी आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद