शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

किरायेदार म्हणून आले ; घरमालक समजू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : शहरात स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश लोकांनी कॉम्प्लेक्स व बिल्डिंग तसेच घरे भाड्याने दिली आहेत. अनेकदा ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : शहरात स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश लोकांनी कॉम्प्लेक्स व बिल्डिंग तसेच घरे भाड्याने दिली आहेत. अनेकदा उपद्रवी भाडेकरू किरायदार म्हणून आले आणि स्वतःला घर मालक समजू लागल्यामुळे भांडणाचे प्रकार वाढले आहेत. काही केसेस मात्र कोर्टापर्यंत सुरू आहेत.

मालकाकरवी घरातील सामान बाहेर फेकण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. करारनामा असलेल्या लोकांनाही या उपद्रवाला सामोरे जावे लागते. चार भिंतींच्या आतील आपले भांडण पोलीस स्टेशन आणि कोर्टातदेखील जात असल्यामुळे घरमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

घर भाड्याने देताना समोरच्या व्यक्तीचे आधार कार्ड, त्याच्याकडे असलेल्या वोटर आयडी या घरमालकांनी सोबत घेतलेल्या पाहिजे. परिसरात प्रतिष्ठित माणसाने कोणाला ओळखतो, याचीसुद्धा खात्री करून घ्यावी. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला सामोरे जाताना समोरच्या व्यक्तीला अद्दल घडविणे सोपे जाते. शकतो हा प्रकार गुंठेवारी एरियामध्ये मोठ्या प्रमाणात घडलेला आहे.

अनेकदा भाडेकरू हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सांगण्यावरून करतो आणि घर मालकाला मनस्तापातून कमी-अधिक भावात ती मालमत्ता विक्री काढावी लागते, तेव्हा त्यातून त्याची सुटका होते. त्या मालमत्तेवर असलेला डोळा समोरचा व्यक्ती साध्य करतो.

घर भाड्याने देताना ही काळजी..

-भाडे करारनामा करून घ्यावा त्यात सर्व गोष्टी नमूद कराव्यात

-समोरच्या व्यक्तीच्या ओळखीचा फोटो आयडीदेखील आपल्याकडे असावा.

-ज्या परिसरामध्ये भाडेकरू राहायला आला, त्याने जुनं घर का सोडले, घरांतील तुटफुट दुरुस्ती, तसेच काही बदल नुकसान हे देखील स्पष्ट लिहावे.

अनेक प्रकरणे न्यायालयात...

१) घरातील पाणी बिल लाईट बिल यावरून घर मालक आणि किरायदार यांच्यात भांडणे होतात

२) भाडे वेळेवर न देणे, घर खाली न करणे, भाडे घेण्यासाठी आल्यावर घर मालकाला शिव्या देणे

३) लोकांच्या सांगण्यावरून घर मालकासोबत भांडणाचे प्रकार वाढले

४) एखादा भू माफिया जागा बळकावण्यासाठी किरायदारामध्ये भांडणे लावतो, पडद्याआड राहून साथ देतो.

५) अनेकदा ऐरणीवर आलेले भांडणं मध्यस्ताच्या प्रयत्नाने अर्थाअर्थी सोडविले जातात.

पोलीस प्रमुखाचा कोट.....

परिसरात अनेक ठिकाणी किरकोळ बाबीवरून भांडणे होतात. भांडणे टोकाला जातात. काही लोकांच्या सांगण्यावरून भाडेकरू आणि घरमालक यांच्यात संबंध बिघडण्याचे प्रकार होतात. समजूत घालून भांडणे सोडविली जातात, अन्यथा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करावी लागते.

-घनशाम सोनावणे, सहायक पोलीस निरीक्षक.

(८८८ डमी)