शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

वाहतूकनगरी बाबतची मंत्रिमंडळाची घोषणा हवेतच; वर्षभरानंतरही जागेचा ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:26 IST

राज्य शासनाच्या विकासकामाच्या निर्णयात प्रशासकीय दिरंगाई होऊन एखादा प्रकल्प कसा रखडतो याचे उत्तम उदाहरण म्हणून करोडी येथील वाहतूकनगराचा उल्लेख करावा लागेल.

ठळक मुद्देकरोडी येथील ग.नं. २४ मधील २४ हेक्टर जागा वाहतूकनगरासाठी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता दोन वर्षे पूर्ण होतील, पण वाहतूकनगरासंदर्भात एकही कागद अजून हालला नाही. 

- प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : राज्य शासनाच्या विकासकामाच्या निर्णयात प्रशासकीय दिरंगाई होऊन एखादा प्रकल्प कसा रखडतो याचे उत्तम उदाहरण म्हणून करोडी येथील वाहतूकनगराचा उल्लेख करावा लागेल. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ  बैठकीत वाहतूकनगर उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी २४ हेक्टर जमीनही उपलब्ध करून दिली होती. संपूर्ण प्रकल्प उभारण्याची जबाबदारी ज्या एमएसआरडीसीवर टाकली होती, तेथील वैचारिक गोंधळामुळेच वाहतूकनगराची प्रक्रियाच रखडली आहे. 

आज देशात ६० टक्के मालवाहतूक ही रस्त्यानेच होते. औरंगाबादेत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मागील ८ महिन्यांत बीड बायपास जडवाहनाखाली येऊन १० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. जडवाहने शहरात येत असल्याने ती अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. अशा वेळी शहराला नवीन बायपास व रिंगरोडची आवश्यकता आहे. तसेच  ‘वाहतूकनगरा’ची उभारणी होणे आवश्यक आहे. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. करोडी येथील ग.नं. २४ मधील २४ हेक्टर जागा वाहतूकनगरासाठी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या वाहतूकनगरला लागून नागपूर-मुंबई हा समृद्धी मार्ग तयार केला जात आहे. त्याचे काम करणाऱ्या एमएसआरडीसीलाच वाहतूकनगर प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने देण्यात आली. 

एमएसआरडीसीने महसूल विभागाकडून जागा ताब्यात घेणे. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून रीतसर जागेची मोजणी करणे. बांधकामाच्या डीपीआरडी (विकास आराखडा) तयार करणे. आराखड्यानुसार आवश्यक त्या निधीची तरतूद शासनाकडे पाठविणे. निधी मिळताच वाहतूकनगरच्या उभारणीस सुरुवात करणे, ही जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. मात्र, या विभागाने फक्त प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) म्हणून मुंबईच्या फोरस्ट्रेक कंपनीची निवड केली. 

याशिवाय दुसरे कोणतेच काम विभागाकडून झाले नाही. परिणामी, मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता दोन वर्षे पूर्ण होतील, पण वाहतूकनगरासंदर्भात एकही कागद अजून हालला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वैचारिक गोंधळ होय. एकीकडे अधिकारी मालवाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय काम प्रगतिपथावर आहे असे सांगितल्या जात आहे तर दुसरीकडे  वाहतूकनगरच्या जागेवर जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याचे उत्तर प्रसिद्धीमाध्यमांना दिले जात आहे.  मात्र, संबंधित वकिलांनी वाहतूकनगर व जनहित याचिकेचा काही संबंध नसल्याचे सांगितले. यामुळे एमएसआरडीसीचे पितळ उघडले पडले आहे. 

वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविता येईलऔद्योगिक वसाहत व बाजारपेठेमुळे दररोज शहरात ४ हजार ट्रक ये-जा करीत असतात. त्यांना थांबण्यासाठी ‘वाहतूकनगर’ उभारणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही दोन वर्षे पूर्ण होत आहेत, पण अजून काम काही मार्गी लागत नाही, ही खेदाची बाब आहे. एमएसआरडीसीने कामाची गती वाढवावी. वाहतूकनगर झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविता येईल. फैय्याज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना 

जनहित याचिकेमुळे काम रखडले करोडी येथे वाहतूक उभारणीची जबाबदारी एमएसआरडीसीवर आहे. अजूनही महसूल विभागाने जागेचा ताबा दिला नाही. तेथे भूमी अभिलेख विभागाने मोजणी करण्यासाठी पत्र दिले, पण काहीच झाले नाही. मुळात ती जागा विधि महाविद्यालयाला देण्यात यावी, यासाठी जनहित याचिका दाखल झाली आहे. यामुळे काम रखडले आहे. - विक्रम जाधव, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

वाहतूकनगरचा जनहित याचिकेशी संबंध नाही करोडी येथील १८७ एकर गायरान जमिनीपैकी ५० एकर जागा नॅशनल लॉ युनिव्हर्ससिटीसाठी २०१० मध्ये देण्यात आली होती. उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे दिली होती. मात्र, तेथे पाण्याची उपलब्धता नसल्याने त्याऐवजी कांचनवाडी येथील वाल्मी परिसरातील गट नं.१९ येथील जागा मिळावी यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेचा व मालवाहतूकनगरचा काहीही संबंध नाही. - अ‍ॅड.सतीश तळेकर

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारTrafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादChief Ministerमुख्यमंत्री