शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बसपोर्ट, मॉडेल स्टेशनचे काम रखडले; औरंगाबादच्या वाहतूक क्षेत्राच्या विकासाला कोरोनामुळे खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:52 IST

बसपोर्ट, मॉडेल स्टेशनचा दुसरा टप्पा, नव्या विमानसेवा, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा लांबणीवर

ठळक मुद्देबसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झालेमॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे ३ जुलै २०१५ रोजी भूमिपूजनही झाले

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : बससेवा, रेल्वे, विमान या दळणवळण सुविधा परिपूर्ण असल्यावर कोणत्याही शहराचा विकास फास्ट ट्रॅकवर येतो. औरंगाबादेत वाहतूक क्षेत्रासाठी अनेक नव्या गोष्टींची घोषणा झाली. मात्र, काही गोष्टी अर्धवट राहिल्या, तर काही कागदावरच. त्यात आता कोरोनाचाही फटका. त्यामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासाला खीळ बसली आहे.

औरंगाबादेत सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले; परंतु अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी बांधकाम शुल्क माफ करावे, अशी मागणी एसटी महामंडळाने मनपाकडे केली आहे; परंतु मनपाने त्यासंदर्भात निर्णय न घेतल्याने बसस्थानक उभारणीच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. विभाग नियंत्रण अरुण सिया म्हणाले, कोरोनामुळे बसपोर्ट, बसस्थानक उभारणीवर काही परिणाम होणार नाही. लवकरच काम सुरू होईल.मॉडेल रेल्वेस्टेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु अजूनही हे काम सुरूच झालेले नाही. नव्या रेल्वे सुरू होण्यासाठी ही सुविधा गरजेची आहे; परंतु कोरोनामुळे याचेही प्रत्यक्षात काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे.

विमानतळ सज्ज, विमानसेवा कंपन्यांनी पुढे येण्याचे आवाहनविमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. आता विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा आहे. विविध देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली झाल्या होत्या; परंतु आता कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर निर्बंध आले आहे. शहराला मुंबई, दिल्ली, हैदराबादची सध्या हवाई कनेक्टिव्हिटी आहे. किमान इतर नव्या शहरांना कधी विमानसेवा सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे. विमानतळाचे संचालक डी. जी साळवे म्हणाले, विमानतळ सेवेसाठी सज्ज आहे. विमान कंपन्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनfundsनिधीcorona virusकोरोना वायरस बातम्या