शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

'बस आगारांमध्येच'; कोरोना संकटाने १३३ कोटींनी ‘एसटी’ खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 19:52 IST

तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती.

ठळक मुद्देकोरोनाच्या १४ महिन्यांत २६८ दिवस रोज ५० लाखांचे नुकसान

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या लाटेपाठाेपाठ दुसऱ्या लाटेतही ‘एसटी’च्या वाहतुकीवर निर्बंध लागले. परिणामी, जिल्ह्यात महामंडळाची बस ठप्प झाली. कोरोनाच्या गेल्या १४ महिन्यांत एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला २६८ दिवस रोज ५० लाखांच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले. यातून तब्बल १३३ कोटींनी औरंगाबादची ‘एसटी’ खड्ड्यात गेली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध गरजेचे आहेत; पण त्यासाठी ‘एसटी’ला कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने २३ मार्चपासून लाॅकडाऊन जारी केले हाेते. परिणामी, एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती. त्यानंतर पुढील ५ महिने एसटीची सेवा रुळावर येत नाही तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यामुळे ‘एसटी’च्या वाहतुकीवर पुन्हा निर्बंध आले. अत्यावश्यक सेवेसाठीच ‘एसटी’ला मुभा देण्यात आली. ‘एसटी’ने मालवाहतूकही सुरू केली; परंतु त्यातून ‘एसटी’चे कोट्यवधी रुपयांचे नुकसान भरून निघेल, अशी स्थिती नाही.

वैयक्तिक वाहनांनी प्रवासावर भरगतवर्षी ऑक्टोबरपासून एसटीची सेवा सुरळीत झाली. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक वाहनांनी प्रवास करण्यावर भर दिला. जुन्या चारचाकी खरेदीचे प्रमाण वाढले. त्यामुळे ‘एसटी’ची प्रवासी संख्या कमी झाली. डिझेल भरण्यासाठीही पैसे नसल्याची स्थिती काही आगारांची झाली होती. अशा परिस्थितीत गतवर्षी २२३ आणि यावर्षी मागील ४५ दिवस एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला आर्थिक फटका बसला. जिल्ह्यात एसटी महामंडळाचे तब्बल २ हजार ९०० कर्मचारी आहे.

रोज ५० लाख रुपयांचे नुकसानकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन हाेते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षी गेल्या ४५ दिवसांत २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत प्रत्येक दिवसाला साधारण ५० लाख रुपयांचे नुकसान झाले.-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

जिल्ह्यातील ‘एसटी’च्या नुकसानीची स्थिती- वर्ष २०२०-नुकसानीचे दिवस - २२३-एकूण नुकसान - १११ कोटी

- वर्ष २०२१- नुकसानीचे दिवस - ४५- एकूण नुकसान - २३ कोटी

जिल्ह्यातील स्थिती- एकूण बस - ५५०- चालक - १,२१३- वाहक - ९३१- एकूण कर्मचारी - २,९००- कोरोनापूर्वी रोजच्या फेऱ्या - ६,२२२

एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाची स्थिती- रोजचे नुकसान - १५ ते २० लाख रुपये- चालक - २५६- वाहक - १७७- एकूण कर्मचारी - ५५३

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या