शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'बस आगारांमध्येच'; कोरोना संकटाने १३३ कोटींनी ‘एसटी’ खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 19:52 IST

तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती.

ठळक मुद्देकोरोनाच्या १४ महिन्यांत २६८ दिवस रोज ५० लाखांचे नुकसान

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या लाटेपाठाेपाठ दुसऱ्या लाटेतही ‘एसटी’च्या वाहतुकीवर निर्बंध लागले. परिणामी, जिल्ह्यात महामंडळाची बस ठप्प झाली. कोरोनाच्या गेल्या १४ महिन्यांत एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला २६८ दिवस रोज ५० लाखांच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले. यातून तब्बल १३३ कोटींनी औरंगाबादची ‘एसटी’ खड्ड्यात गेली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध गरजेचे आहेत; पण त्यासाठी ‘एसटी’ला कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने २३ मार्चपासून लाॅकडाऊन जारी केले हाेते. परिणामी, एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती. त्यानंतर पुढील ५ महिने एसटीची सेवा रुळावर येत नाही तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यामुळे ‘एसटी’च्या वाहतुकीवर पुन्हा निर्बंध आले. अत्यावश्यक सेवेसाठीच ‘एसटी’ला मुभा देण्यात आली. ‘एसटी’ने मालवाहतूकही सुरू केली; परंतु त्यातून ‘एसटी’चे कोट्यवधी रुपयांचे नुकसान भरून निघेल, अशी स्थिती नाही.

वैयक्तिक वाहनांनी प्रवासावर भरगतवर्षी ऑक्टोबरपासून एसटीची सेवा सुरळीत झाली. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक वाहनांनी प्रवास करण्यावर भर दिला. जुन्या चारचाकी खरेदीचे प्रमाण वाढले. त्यामुळे ‘एसटी’ची प्रवासी संख्या कमी झाली. डिझेल भरण्यासाठीही पैसे नसल्याची स्थिती काही आगारांची झाली होती. अशा परिस्थितीत गतवर्षी २२३ आणि यावर्षी मागील ४५ दिवस एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला आर्थिक फटका बसला. जिल्ह्यात एसटी महामंडळाचे तब्बल २ हजार ९०० कर्मचारी आहे.

रोज ५० लाख रुपयांचे नुकसानकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन हाेते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षी गेल्या ४५ दिवसांत २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत प्रत्येक दिवसाला साधारण ५० लाख रुपयांचे नुकसान झाले.-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

जिल्ह्यातील ‘एसटी’च्या नुकसानीची स्थिती- वर्ष २०२०-नुकसानीचे दिवस - २२३-एकूण नुकसान - १११ कोटी

- वर्ष २०२१- नुकसानीचे दिवस - ४५- एकूण नुकसान - २३ कोटी

जिल्ह्यातील स्थिती- एकूण बस - ५५०- चालक - १,२१३- वाहक - ९३१- एकूण कर्मचारी - २,९००- कोरोनापूर्वी रोजच्या फेऱ्या - ६,२२२

एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाची स्थिती- रोजचे नुकसान - १५ ते २० लाख रुपये- चालक - २५६- वाहक - १७७- एकूण कर्मचारी - ५५३

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या