शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

घरफोडी करणारी टोळी अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:46 AM

औरंगाबाद ग्रामीण भागात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, सोन्याचे दागिने असा ४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण भागात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, सोन्याचे दागिने असा ४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.देवगाव रंगारी येथील शकील अब्दुल करीम मनियार (३७) यांच्या घराच्या मागील दरवाजा तोडून त्यातून चोरट्यांनी प्रवेश करून ५ लाख ७४ हजार ९५६ रुपयांचा माल चोरून नेला होता. रोख रक्कम, मोबाइल, सोन्याचे दागिने इत्यादी चोरी झाल्याचे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. गुन्ह्यातील गेलेला माल व चोरट्यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. बातमीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तपासाची चक्रे फिरविली असता मनोज भास्कर कदम (२६, रा. देवगाव रंगारी) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व त्याचे अन्य साथीदार सतीश लक्ष्मण पोपळघट (२४), विनोद ऊर्फ बंटी राजू कदम, मंगेश गौतम (सर्व रा. देवगावरंगारी), मनीष तुकाराम सोनवणे (२१, रा. राजकरनगर, धुळे) यांनी मिळून ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, पोहेकॉ रतन वारे, पोलीस नाईक किरण गोरे, आशिष जमधडे, सागर पाटील, योगेश तरमाळे, शेख अबुबकर यांच्या पथकाने आरोपी मनोज कदम, सतीश पोपळघट, मनीष सोनवणे या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यातील १९ मोबाइल, सोन्याचे दागिने असा एकूण ४,५०,००० किमतीचा ऐवज पोलिसांना दिला. इतर ऐवज व दोन आरोपी अद्याप पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे.