शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १५ व्या मिनिटाला कॉल, २ कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:03 IST

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-४ मध्ये रात्री ०८:४५ वाजेची खळबळजनक घटना; पोलिसांकडून कसून तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : दाेन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा ७ वर्षीय मुलगा चैतन्य याचे कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी घटनेच्या १५ मिनिटांतच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मंगळवारी रात्री ०८.४५ वाजता एन-४ मध्ये ही घटना घडली.

तुपे हे बिल्डर असून, त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. सुनील कुटुंबासह एन-४ मधील सेक्टर एफ-१ मध्ये वास्तव्यास असतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतल्यानंतर ते दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते. चैतन्यचा लहान भाऊ वडिलांसोबत होता. चैतन्य सायकलवरून घरापासून एन-४ च्या रस्त्याच्या दिशेने जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली. त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांनी कार उभी केली. चालकाच्या मागील बाजूने दोघे उतरले. एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले. दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली. त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले.

१५ मिनिटांत कॉलसुनील मात्र चैतन्य लांब गेला असेल, या शंकेने परिसरात शोधत निघाले. तेवढ्यात त्यांच्या मोबाइलवर अनाेळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलवरील व्यक्तीने त्यांना आधी मराठी व नंतर हिंदीतून ‘बच्चा चाहिए तो २ करोड देना पडेेंगे’ असे सांगितले.

चोहोबाजूंनी नाकाबंदीअपहरणाची घटना उघड होताच शहरासह सर्व जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला. कुटुंबाने पोलिस आयुक्तालयात धाव घेतली. आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून जवळपास ३० पोलिस अधिकारी, १२० पेक्षा अधिक अंमलदार, सर्व ठाण्यांची डीबी पथके, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबरचे अधिकारी रस्त्यावर उतरले. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून अपहरणकर्त्यांचा माग काढला जात होता.

आधीपासूनच मोबाइल क्रमांक, सोसायटीची पुरेशी रेकीअपहरणकर्त्यांकडे आधीपासूनच सुनील यांचा मोबाइल क्रमांक होता. अपहरणाच्या आधी त्यांनी त्यांच्या निवासस्थान व आसपासच्या परिसराची रेकी केली होती. अपहरणकर्ते सोसायटीत दुसऱ्या मार्गाने प्रवेश करत थेट सुनील यांच्या घरापर्यंत पाेहोचले. तेव्हा सुनील लहान मुलासोबत काही अंतरावर खेळत हाेते. त्याच रस्त्यावर चैतन्य सायकल खेळत होता. तो एकटाच मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताच अपहरणकर्त्यांनी त्याच्या मागे जात डाव साधला. हनुमान चौक ते कामगार चौकातून सिडको चौक व पुढे जळगाव रोडच्या दिशेने हर्सूल सावंगीच्या दिशेने कार गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहराच्या चारही बाजूंनी नाकाबंदी-शहरासह चिकलठाणा, करमाड, जालना, पैठण, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर पोलिसांना नाकाबंदीचा आदेश देण्यात आला.-सर्व टोलनाक्यांवर अपहरणकर्त्यांच्या कारचे वर्णन पाठवण्यात आले.

या दिशेने तपासपोलिसांचा विविध पथकांकडून तपास सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत परिसरातील बांधकाम साइटवरील मजूर, तुपे यांच्या बांधकाम साइटवरील कामगार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिस माहिती घेत हाेते. सुनील यांना कॉल केल्यानंतर अर्ध्या तासातच अपहरणकर्त्यांचा मोबाइल बंद झाला होता.

निकृष्ट दर्जाच्या सीसीटीव्हीमुळे अडचणकोट्यवधी रुपये खर्च करून शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने पोलिसांना फुटेजमध्ये अडचणी आल्या. या कॅमेऱ्यात रात्रीची घटना नीट कैद झाली नाही. शिवाय, कारचा क्रमांकही दिसून आला नाही. सुनील यांचे सासरे राजकीय नेते असून, त्यांचे बांधकामासह विविध व्यवसाय आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी